बारामती : कोणताही साखर कारखाना जवळपास १५० दिवस पूर्ण क्षमतेने चालविला पाहिजे, तरच त्यांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर होतो व सर्वांगाने फायदा सुद्धा होतो, राज्य सरकारने या वर्षी १५ नोव्हेंबरला राज्यातील सर्व साखर कारखाना गाळप करण्यास परवानगी दिल्यामुळे जवळपास पंधरा दिवस आपला साखर कारखाना उशिरा सुरू झालेला आहे, असे असताना देखील आपण आपल्या कारखान्याकडे नोंदविलेले संपूर्ण ऊस साधारण २० ते २५ मार्च २०२५ अखेर पर्यंत संपवणार असून आपल्याकडे नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे, कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी बाहेरील साखर कारखान्याला ऊस घालू नये, बाहेरील कारखान्याला ऊस घालणाऱ्या सभासदांच्या सर्व सवलती बंद करण्यात येणार आहेत, असे पत्रक सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिद्धीसाठी दिलेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा