पुणे : नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी, महिला, रोजगार याबाबत दिलेली आश्वासने आणि वस्तुस्थिती यात फरक आहे. सत्तेचा उन्माद काय असतो हे मोदींनी दाखवले आहे. त्यामुळे आता त्यांना सत्ता द्यायची नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. मोदींचा पराभव करण्यासाठी तयार रहा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्ला चढवला.  पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या सभेत पवार बोलत होते.

हेही वाचा >>> अमोल कोल्हे यांची संपत्ती पाच वर्षांत झाली दुप्पट

Chandrapur, Congress, Ayarams, loyalists, assembly elections, Maha vikas Aghadi, candidature, party tensions, Maharashtra assembly election 2024,
आयारामांमुळे काँग्रेस निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; चंद्रपूर जिल्ह्यातील चित्र
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Buldhana Assembly Election
बुलढाणा: युतीत आलबेल, आघाडीत रस्सीखेच; विधानसभा निवडणुकीसाठी…
chairmanship of ladki bahin scheme review committee hand over to mlas of ruling party in thane district
लाडकी बहीण’ योजनेत सत्ताधारी आमदारांचीच वर्णी
MLA Ganesh Naik advised leaders of the Mahayuti about assembly election in the Mahayuti meeting
Ganesh Naik : लोकसभा निवडणुकीत महायुतीवरील लोकांचे प्रेम कमी झाले, आमदार गणेश नाईक यांच्या महायुती बैठकीत कानपिचक्या
We will achieve hundred percent success in Satara district says Muralidhar Mohol
सातारा जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळवू – मुरलीधर मोहोळ
Thane, Maha vikas Aghadi, Congress, assembly elections, constituencies, Uddhav Thackeray, seat allocation, political rift, Thane City,
ठाणे जिल्ह्यातील पाच जागांवर काँग्रेसचा दावा, काँग्रेसच्या यादीत उबाठाच्या दोन जागांचाही समावेश
congress muslim candidates vidhan sabha
सर्व जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांना उमेदवारी द्या; काँग्रेसमध्ये दबाव वाढला

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी रवींद्र धंगेकर, बारामती मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे, शिरूरसाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी एकत्रच उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या सभेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. विश्वजित कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, की २०१५ मध्ये पेट्रोल ७१ रुपये होते. आज १०६ रुपये झाले आहे. ४१० रुपयांचा सििलडर ११६० रुपये झाला. तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दहा वर्षांत नोकऱ्या कमी झाल्या. मोदींवर टीका केली म्हणून झारखंड, दिल्लीचे मुख्यमंत्री, बंगालच्या तीन मंत्र्यांना तुरुंगात टाकले. देशातील लोकशाही उद्ध्वस्त होत आहे.