लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: दुचाकी चोरणाऱ्या जळगावातील टोळीला वाकड पोलिसांनी थेरगावातून अटक केली. त्यांच्याकडून पाच लाखांच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

Ahmednagar, accused ran away,
अवघ्या शंभर मीटर अंतरावर पोलीस ठाणे, तरी पोलिसांच्या तावडीतून निसटला आरोपी, शेवटी…
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
Engineer turned farmer
Success Story: इंजिनिअर झाला शेतकरी… आरोग्यासाठी आयटी कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून केली शेती; वर्षाला लाखोंची कमाई
drones, girgaon chowpatty, missing children girgaon,
गिरगाव चौपाटीवर ड्रोन उडवणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा, हरवलेली ३९ मुले कुटुंबियांकडे सुपूर्द
vandalized vehicles Pimpri Chinchwad, Pimpri-Chinchwad latest news,
पिंपरी-चिंचवड: १४ वाहनांची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
youth threatens to kill family over old conflict at shahad near kalyan
कल्याण जवळील शहाड येथे जुन्या भांडणातून  कुटुंबाला ठार मारण्याची तरूणाची धमकी
Questions to Girish Mahajan in Jamner taluka due to bad condition of the roads
रस्त्यांच्या अवस्थेवरुन जामनेर तालुक्यात गिरीश महाजनांवर प्रश्नांची सरबत्ती

कमलेश भागवत परदेशी (वय २२) शुभम राजेंद्र निकम (वय २०), पुष्पक दिलीप पाटील (वय २३) आणि प्रज्वल लालजी भोसले (वय २४, सर्व रा. चिंचवड, मूळ चाळीसगाव, जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-पुणे: येरवड्यातील खुल्या कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

वाकड पोलीस थेरगाव परिसरात गस्त घालत होते. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी चोरटे थेरगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. पोलीस दिसताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी दुचाकींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. वाकड, चिखली, येरवडा, पिंपरी, चिंचवड परिसरातून दहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून पाच लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

जीपीएस यंत्रणा बसविण्याचे पोलिसांचे आवाहन

शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत. पार्किंगची व्यवस्था नसल्यास चैन, दुसरे कुलूप लावावे. जीपीएस यंत्रणा बसवून घ्यावी. वाहने सोसायटी, कंपनी, मॉल, दुकानांच्या बाहेर रोडवर लावू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले.