पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होताच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर सावध भूमिका घेतली आहे. आधी सर्व चित्र स्पष्ट होऊ द्या मग मी यावर बोलेल असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. राज्यात भाजपा हे जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहे. शेतकरी आणि आरक्षण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या समाजविरोधात बळाचा वापर केला जातो आहे. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आणखी वाचा-उन्हाचा ताप वाढला, पालेभाज्यांच्या दरात वाढ

maharera issue model guidelines to regulate senior citizen housing projects
ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणासाठी विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलत! राज्याकडून मसुदा जाहीर; हरकती-सूचनांसाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदत
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Vasai, BJP leader, vadhavan port, fishermen,
वसई : वाढवण बंदराच्या विरोधात भाजप नेत्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे मच्छीमारांमध्ये संभ्रम
Suicide attempt due to mental stress is not a crime
मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही…
lok sabha mp and actress kangana ranaut
Kangana Ranaut : “शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या”; कंगना रनौत यांचं विधान चर्चेत!
polish women poland uma devi
महात्मा गांधींनी ‘उमादेवी’ अशी ओळख दिलेल्या वांडा डायनोस्का कोण होत्या? पोलंडमधील या महिलेने भारतात आपली ओळख कशी निर्माण केली?
Maski couple protest, independent Vidarbha,
अन्… मस्की दाम्पत्यांनी स्वत:ला साखळी बेड्यामध्ये जखडून पिंजऱ्यामध्ये बंद करुन घेतले
Maratha Reservation, reservation,
आंदोलनांना बळी पडून आरक्षण दिले, तर राज्यातही बांगलादेशसारखी परिस्थिती, आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा दावा

आदित्य ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे यांच्यावर काही बोलणार नाही. सर्व चित्र स्पष्ट होऊ द्या. परंतु, अंतरवली सराटीत लाठीचार्ज झाला, त्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले की मुख्यमंत्र्यांनी? याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे. लोक न्याय हक्कांसाठी लढत आहेत. त्यांच्या विरोधात बळाचा वापर केला जात आहे. शेतकरी आणि आरक्षणासाठी लढणाऱ्या समाजाच ऐकून घ्या, चर्चा करा. अस न करता हे सरकार हुकुशाही करत आहे. पुढे ते म्हणाले, जातीत आणि धर्मांत भांडणं लावायचं काम भाजप करत आहे. हे विष पेरून काही होणार नाही. राजकारणाचा चोथा झाला आहे. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.