पिंपरी :  शिवसेना-भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी केल्याने मित्र पक्ष भाजपने हल्ला केला आहे. अकलेचे तारे तोडून असे विधान करणाऱ्या मिटकरी यांनी तत्काळ माफी मागावी किंवा श्रीलंकेत स्थायिक होऊन रावणाची पूजा करावी, असा सल्ला देत माफी न  मागितल्यास त्यांच्या पुतळ्याचे महाराष्ट्रभर दहन करण्याचा इशारा भाजपचे पिंपरी विधानसभा  निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी दिला आहे.

 आमदार अमोल मिटकरी यांनी अकलेचे तारे तोडून रावण दहनावर बंदी आणावी असे विधान केले आहे. रामायनातील संपूर्ण  वानर सेना ही मागासवर्गीय वंचित, सर्व समाजातील होती. याचा उत्तम उल्लेख श्रेष्ठ वाल्मिकी ऋषी यांनी केला असताना,  या सर्व  समाजाच्या यशाला काळीमा फासण्याचा प्रकार मिटकरी यांनी केला आहे. राज्यात रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याबाबत  हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 

हेही वाचा >>>पुणे : नवरात्रोत्सवातील कार्यक्रमात महिलेसह दोघांवर कोयत्याने वार, तीन तरुणांना अटक

वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणाला आव्हान देण्याचा प्रकार मिटकरी  करत आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून सर्व जनतेच्या आणि खास करून वंचित ,मागासवर्गीय जनतेच्या भावना दुखावणारा आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा प्रकारची मागणी त्यांनी पुन्हा केली तर संपूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलन उभे करून ठिकठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येईल असा इशारा गोरखे यांनी दिला  आहे.

Story img Loader