पिंपरी- चिंचवड: आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचीच पुनरावृत्ती होईल. भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील आणि भाजपा नंबर- १ होईल, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारिणीची संघटनात्मक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवून नंबर- १ राहिल्याबद्दल विजेते उमेदवार, पक्षाचे कार्यकर्ते, भाजपा परिवारातील सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
delhi assembly election 2025
लालकिल्ला : भाजपसाठी वर्ग ठरला ‘धर्म’!
Chandrashekar Bawankule statement in Pimpri after Delhi Assembly elections
“केजरीवाल, काँग्रेसला दिल्लीच्या जनतेने धु-धु धुतले”, दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री- चंद्रशेखर बावनकुळे
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
BJP member registration deadline has passed but not even half of target has been met
भाजप सदस्य नोंदणी! ‘तारीख पे तारीख’ सदस्य जुळता जुळेना

आणखी वाचा-पुण्यातील माजी नगरसेविकेवर बलात्कार प्रकरण : आरोपीची जामिनावर सुटका

यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक योगेश बाचल माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस शितल शिंदे, शैलजा मोळक, संजय मंगोडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे आदी उपस्थित होते.

राज्यातील नुकतेच २ हजार ३५९ ग्रामंपचायतींची निवडणूक झाली. त्यापैकी तब्बल भाजपाने ७१६ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. महायुतीला १ हजार ३६९ ठिकाणी विजय मिळाला आहे. विजयाचा हा वारू असाच कायम ठेवण्यासाठी संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत करावी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने राज्यात ‘महाविजय- २०२४’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बूथनिहाय यंत्रणा कामाला लागली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पूर्ण बहुमताने विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

आणखी वाचा-पिंपरी : प्रदूषण करणाऱ्यांवर आता कारवाई, महापालिकेची विशेष पथके तैनात

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपा नंबर- १ राहील, असा विश्वास आहे. भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षश्रेष्ठींच्या निर्देशाप्रमाणे संघटनात्मक कार्यात सक्रीय आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत मोदी सरकारचे महत्त्वाकांक्षी निर्णय आणि कल्याणकारी योजना आम्ही पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांचा कल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजुने असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभावी संघटन हेच भाजपाच्या यशाची गुरूकिल्ली आहे.

Story img Loader