पुणे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. एकूण ९२.७१ टक्के लागला असून, महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९०.४८ टक्के लागला. देशपातळीवर १ लाख ३४ हजार ७९७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.

CBSE 12th Result 2022 : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Maharashtra students, Ayurveda degree, Ayurveda,
परराज्यातून आयुर्वेद पदवी घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून प्रवेश
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Navi Mumbai, redevelopment , building,
नवी मुंबई : पुनर्विकासातील ‘लबाडी’ला अंकुश! इमारत धोकादायक नसतानाही पुनर्विकासाचा घाट घालणाऱ्यांवर वचक
27 percent of agriculture degree seats vacant
कृषी पदवीच्या २७ टक्के जागा रिक्त; नोकरीच्या संधी, पदभरती घटल्याने विद्यार्थ्यांची पाठ
IIT Mumbai, JEE toppers, IIT Mumbai latest news,
जेईईत अव्वल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबईला पसंती
Due to the new decision of the school education department there is a possibility of educational loss for poor students in rural areas
शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता
15 days deadline for installation of CCTV in Government Ashram Schools of Tribal Development Department nashik
आश्रमशाळांना सीसीटीव्हीसाठी १५ दिवसांची मुदत; आदिवासी विकास विभागाचा निर्णय
divisional secretary warns principals
नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएससीने परीक्षा पद्धतीत बदल करून दोन सत्रांची परीक्षा घेतली. २६ एप्रिल ते १५ जून या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. मात्र दरवर्षीच्या तुलनेत सीबीएससीचा निकाल यंदा लांबल्याने विद्यार्थी आणि पालकांना निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर सीबीएससीने निकाल जाहीर केला. देशपातळीवरील एकूण निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास सहा टक्क्यांनी घटला आहे. विद्यार्थ्यांमधील गुणांच्या स्पर्धेमुळे निर्माण होणारी अस्वस्थता लक्षात घेऊन गुणवत्ता यादी आणि विद्यार्थ्यांना श्रेणी न देण्याचा निर्णय सीबीएससीईने घेतला.

त्रिवेंद्रम विभाग ९८.८३ टक्के गुणांसह देशात आघाडीवर –

यंदा १५ हजार ७९ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील  १४ लाख ४४ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. परीक्षा दिलेल्या १४ लाख ३५ हजार ३६६ विद्यार्थ्यांपैकी १३ लाख ३० हजार ६६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीबीएसीच्या विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाने ९८.८३ टक्के गुणांसह देशात आघाडी घेतली. त्या खालोखाल बेंगळुरू विभागाचा निकाल ९८.१६ टक्के आणि चेन्नई विभागाचा निकाल ९७.७९ टक्के लागला. नोएडा विभागाचा निकाल सर्वांत कमी ९०.२७ टक्के लागला. विभागीय निकालात पुणे विभाग शेवटून तिसऱ्या स्थानी आहे.