पुणे : केंद्र सरकारच्या ‘मिशन मौसम’ प्रकल्पामुळे हवामान अंदाज अधिक अचूक, तातडीने आणि ठिकाणनिहाय वर्तविणे शक्य होणार आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रामचंद्रन यांनी गुरुवारी दिली.

केंद्र सरकारने ‘मिशन मौसम’ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद असून, हवामान अंदाज वर्तविण्यासाठी लागणारी अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध होणार आहे. हवामान अंदाज अधिक अचूक, तातडीने आणि ठिकाणनिहाय वर्तविणे त्यामुळे शक्य होणार आहे, असे डॉ. रामचंद्रन यांनी सांगितले.

Environmental clearance from the state itself revised notification issued by the central government Mumbai news
राज्यातूनच पर्यावरणविषयक परवानगी, केंद्र सरकारकडून सुधारित अधिसूचना जारी; गृहप्रकल्पांना दिलासा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
Omprakash Rajenimbalkar likely to join Mahayuti minister Pratap Sarnaik
“खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर महायुतीचेच!”, पालकमंत्र्यांकडून ‘ऑपरेशन टायगर’चे संकेत

हे ही वाचा… पुणे शहरात वाहनांची तोडफोड सुरूच; रागातून चाकूने वार आणि फसवणुकीच्या घटनांचीही नोंद

दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रामचंद्रन म्हणाले, ‘मिशन मौसम प्रकल्पांचे दोन टप्पे आहेत. दोन हजार कोटी रुपयांची तरतूद असलेला पहिला टप्पा सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२६ या काळात राबविला जाईल. या टप्प्यात निरीक्षण नोंदविण्याची व्यवस्था अधिक सक्षम केली जाईल. सध्या देशात एस बॅण्ड दर्जाचे केवळ २२ रडार आहेत. अन्य प्रगत देशांच्या तुलनेत त्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे ४०० किलोमीटर परिसरातील अचूक निरीक्षणे नोंदविणाऱ्या अत्याधुनिक अशा रडारची संख्या वाढविली जाईल.

हे ही वाचा…पुणे: मुंबई- बंगळुरु महामार्गालगत होणार एसआरए प्रकल्प; प्रकल्प रद्द होण्याकरिता ‘त्या’ व्यक्तीने घेतल्या मृत व्यक्तींच्या सह्या?

याद्वारे देशातील कानाकोपऱ्यासह जगातील सर्व समुद्र, महासागर, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील हालचाली आणि निरीक्षणे अधिक अचूक नोंदविणे आणि कमीत कमी वेळेत ती आपल्याला मिळण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल. रडार सेवा पुरविणाऱ्या काही जागतिक संस्था, संघटनांशी करार करण्यात येतील. निरीक्षण यंत्रणा अत्याधुनिक करून, तिची व्याप्ती वाढविण्यात येईल. सध्या ढगांची उंची, व्याप्ती आणि ढगातील आर्द्रतेची माहिती मिळते. येत्या काळात ढगांमधील हालचालींचीही माहिती आपल्याला मिळेल. मिळालेल्या माहितीचे वेगाने विश्लेषण करण्यासाठी प्रगत संगणक बसविले जातील. विविध प्रकारच्या प्रारूपांमध्ये समन्वय साधून अचूक अंदाज, समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहचविले जातील.

हे ही वाचा…पिंपरी : बचत गटातील महिलांनी साकारला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा देखावा

हवेच्या गुणवत्तेसाठी ‘मौसम जीपीटी’

येत्या काळात ‘मौसम जीपीटी’सारखी व्यवस्था सुरू करण्याचा विचार आहे. प्रामुख्याने शहरांमधील हवेच्या गुणवत्तेचा अंदाज अचूक वर्तविला जाईल. सध्या सात दिवसांच्या हवामान अंदाजाची अचूकता ७० टक्के आहे, ती ७५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. दीर्घकालीन, अल्पकालीन अंदाजासह सर्वच प्रकारच्या अंदाजांची अचूकता पाच टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम आणि अत्याधुनिक करण्यावर भर असेल, असे डॉ. रविचंद्रन म्हणाले.

Story img Loader