पुणे : केंद्र सरकारच्या ‘मिशन मौसम’ प्रकल्पामुळे हवामान अंदाज अधिक अचूक, तातडीने आणि ठिकाणनिहाय वर्तविणे शक्य होणार आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रामचंद्रन यांनी गुरुवारी दिली.

केंद्र सरकारने ‘मिशन मौसम’ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद असून, हवामान अंदाज वर्तविण्यासाठी लागणारी अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध होणार आहे. हवामान अंदाज अधिक अचूक, तातडीने आणि ठिकाणनिहाय वर्तविणे त्यामुळे शक्य होणार आहे, असे डॉ. रामचंद्रन यांनी सांगितले.

Microsofts big investment in Hinjewadi large amount of employment will be created
Hinjewadi IT Park : मायक्रोसॉफ्टची हिंजवडीत मोठी गुंतवणूक! मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Ulhas bapat modi cji meeting
PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम
pmc to spend rs 20 crore on beautification of bridge constructing on mula river
पूल ३२ कोटींचा आणि सुशोभीकरणावर २० कोटी; महापालिकेचा निर्णय वादात
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Port Blair Centre renames amit shah
Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

हे ही वाचा… पुणे शहरात वाहनांची तोडफोड सुरूच; रागातून चाकूने वार आणि फसवणुकीच्या घटनांचीही नोंद

दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रामचंद्रन म्हणाले, ‘मिशन मौसम प्रकल्पांचे दोन टप्पे आहेत. दोन हजार कोटी रुपयांची तरतूद असलेला पहिला टप्पा सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२६ या काळात राबविला जाईल. या टप्प्यात निरीक्षण नोंदविण्याची व्यवस्था अधिक सक्षम केली जाईल. सध्या देशात एस बॅण्ड दर्जाचे केवळ २२ रडार आहेत. अन्य प्रगत देशांच्या तुलनेत त्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे ४०० किलोमीटर परिसरातील अचूक निरीक्षणे नोंदविणाऱ्या अत्याधुनिक अशा रडारची संख्या वाढविली जाईल.

हे ही वाचा…पुणे: मुंबई- बंगळुरु महामार्गालगत होणार एसआरए प्रकल्प; प्रकल्प रद्द होण्याकरिता ‘त्या’ व्यक्तीने घेतल्या मृत व्यक्तींच्या सह्या?

याद्वारे देशातील कानाकोपऱ्यासह जगातील सर्व समुद्र, महासागर, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील हालचाली आणि निरीक्षणे अधिक अचूक नोंदविणे आणि कमीत कमी वेळेत ती आपल्याला मिळण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल. रडार सेवा पुरविणाऱ्या काही जागतिक संस्था, संघटनांशी करार करण्यात येतील. निरीक्षण यंत्रणा अत्याधुनिक करून, तिची व्याप्ती वाढविण्यात येईल. सध्या ढगांची उंची, व्याप्ती आणि ढगातील आर्द्रतेची माहिती मिळते. येत्या काळात ढगांमधील हालचालींचीही माहिती आपल्याला मिळेल. मिळालेल्या माहितीचे वेगाने विश्लेषण करण्यासाठी प्रगत संगणक बसविले जातील. विविध प्रकारच्या प्रारूपांमध्ये समन्वय साधून अचूक अंदाज, समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहचविले जातील.

हे ही वाचा…पिंपरी : बचत गटातील महिलांनी साकारला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा देखावा

हवेच्या गुणवत्तेसाठी ‘मौसम जीपीटी’

येत्या काळात ‘मौसम जीपीटी’सारखी व्यवस्था सुरू करण्याचा विचार आहे. प्रामुख्याने शहरांमधील हवेच्या गुणवत्तेचा अंदाज अचूक वर्तविला जाईल. सध्या सात दिवसांच्या हवामान अंदाजाची अचूकता ७० टक्के आहे, ती ७५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. दीर्घकालीन, अल्पकालीन अंदाजासह सर्वच प्रकारच्या अंदाजांची अचूकता पाच टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम आणि अत्याधुनिक करण्यावर भर असेल, असे डॉ. रविचंद्रन म्हणाले.