ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे यांच्या वरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुटणीतीच राजकारण करतात. पंकजा मुंडे यांच्या राजकीय वेगवेगळ्या वळणावर फडणवीस यांनी अनेकदा अडचणी निर्माण केल्या आहेत. कूटनीती करून तीन पक्ष फोडले तरीही ते मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत. त्यांची कीव येते अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. त्या पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुषमा अंधारे म्हणाल्या, काही वैक्तिक कारणांमुळे पंकजा मुंडे राजकारणातून दोन महिन्याचा ब्रेक घेत असतील. देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राजकीय जीवनात वेगवेगळ्या वळणावर अडचणी निर्माण करत आहेत. त्यांच्याच समाजातील इतर नेत्यांना ते पुढे आणत आहेत. पंकजा मुंडे यांना कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करत होते. पुढे त्या म्हणाल्या, पंकजा मुंडे या प्रचंड हुशार आहेत. त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता आहे. देवेंद्र फडणवीस हे कुटणीती चे राजकारण करतात. तरीही त्यांची कीव येते आहे की, त्यांनी कुटणीती करून तीन पक्ष फोडले पण तरीही त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही. चाणक्य अपयशी झाले आहेत. पुढे ते मुख्यमंत्री होतील असे वाटत नाही. अशी टीका सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya devendra fadnavis created problems for pankaja munde by cheating sushma andhare kjp 91 ysh
Show comments