भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जांब येथे खून झालेल्या चंद्रकांत गायकवाड यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार वालचंदनगर पोलिसांकडे दिली असल्याची माहिती उघड झाली आहे.
दादा शिवाजी जाधव व सत्पाल महादेव रूपनवर यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी गायकवाड हे मध्ये पडले होते. त्या वेळी बाचाबाची होऊन रूपनवर याने रिव्हॉल्व्हरमधून गायकवाड याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. गायकवाड यांनी जिवाला धोका असल्याची तक्रार १८ जानेवारीला दिली होती. पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2013 रोजी प्रकाशित
जिवाला धोका असल्याची तक्रार त्याने दिली होती
भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जांब येथे खून झालेल्या चंद्रकांत गायकवाड यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार वालचंदनगर पोलिसांकडे दिली असल्याची माहिती उघड झाली आहे.
First published on: 13-02-2013 at 10:46 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant gaikwad murder case