लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचे वचन मी दिले आहे. नदी प्रदूषणमुक्तीसाठी नगरविकास विभागाने ८०० कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नदीसुधार योजनेचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीत दिली.

cm Eknath Shinde inspects landslide prone area in ghatkopar
मुंबई लवकरच दरड अपघात मुक्त करणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; घाटकोपरच्या आझाद नगरमध्ये दौरा
Warkari Invited cm for Mahapuja on Aashadhi
‘या’ तारखेपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वारकऱ्यांनी दिलं महापूजेचं निमंत्रण
Government Schemes, Government Schemes Offer Rehabilitation Path for Naxalites, Naxal, naxal movement, Devendra fadnavis, Devendra fadnavis urges for quit naxal movement, gadchiroli, gadchiroli news,
नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
cm eknath shinde
हद्दवाढ करा; अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर बंदी, काळे झेंडे दाखवणार
Devendra Fadnavis On Police Bharti 2024
पोलीस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची महत्वाची माहिती; म्हणाले, “ज्या ठिकाणी पाऊस, तेथील मैदानी चाचणी…”
Shiv Sena state coordinator Rameshwar Paval demanded cm Eknath Shinde give chance to Dr Srikant Shinde and Prataprao Jadhav
अकोला : केंद्रीय मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात? शिवसेना शिंदे गटाकडून…
shambhuraj desai
देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिल्यास उपमुख्यमंत्रीपदी शंभूराज देसाई? राजकीय चर्चांवर उत्तर देत म्हणाले…
Sushma Andhare on Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीस यांची ‘एक्झिट’ नक्की, आता विनोद तावडे…”, सुषमा अंधारे यांचं सूचक विधान

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारीच्या तोंडावर नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग आला होता. त्यामुळे वारकरी, देवस्थानने नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणे हे सरकारचे काम आहे. त्यासाठी पावले उचलली आहेत. नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. इंद्रायणी प्रदूषणमुक्तीसाठी काम सुरू आहे. लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महेश लांडगेंनी केलं तुकोबांच्या रथाचं सारथ्य

‘बळीराजा सुखी होऊ दे’

मला या पालखी सोहळ्याला येण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, त्याच्यावरील सर्व संकटे, अनिष्ट दूर होऊ देत, महाराष्ट्रातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदाचे दिवस येऊ दे अशी माउलीचरणी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालखी प्रस्थानाला येणारे पहिलेच मुख्यमंत्री

मुख्यमंत्री आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोणतेही मुख्यमंत्री पदावर असताना आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाठी आले नव्हते. आघाडी सरकार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मात्र, मुख्यमंत्री आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.