राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे माणसांच्याच नव्हे, तर पक्ष्यांच्याही जीवनावर परिणाम झाला आहे.

इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावातील सर्वात मोठे चित्रबलाक पक्ष्यांचे सारंगार यंदा दुष्काळामुळे ओस पडले आहे. दरवर्षी मोठय़ा संख्येने येणाऱ्या परदेशी पक्ष्यांनी पाठ फिरविल्याने प्रथमच ही स्थिती निर्माण झाली आहे.

savitribai phule pune university audit news in marathi
संशोधन केंद्रांबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय… होणार काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Guillain Barre Syndrome , Sinhagad Road Area,
संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षणाचे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे निर्देश! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
Pune farmer desi jugaad video farmer jugaad to protect field from bird watch video
VIDEO: पुणेरी शेतकऱ्यानं पक्ष्यांनी ज्वारी खाऊ नये म्हणून केला भन्नाट जुगाड; एक रुपयाही खर्च न करता पिकांचं कायमचं संरक्षण
rushikesh wagh junnar taluka
संशोधनातील वाघ
Dog Helps Small Kitten and carefully carrying in to the roadside
आता मानवानेच प्राण्यांकडून शिकावा माणुसकीचा धडा! भटक्या मांजरीच्या पिल्लाला श्वानाच्या मदतीचा हात; एकदा व्हायरल VIDEO पाहाच
‘तोपची’मधून तोफा, गनर्सचे कौशल्य अधोरेखीत-प्रदर्शनात प्रगत शस्त्रसामग्री सादर
Girish Kuber on Davos Investment
Video: महाराष्ट्राची इतर राज्यांशी स्पर्धा ते देवेंद्र फडणवीसांचा दावोस दौरा, पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

उजनी धरणाची निर्मिती झाल्यानंतर गेल्या पस्तीस वर्षांपासून इंदापूर तालुक्यात युरोप खंडातून अनेक स्थलांतरित पक्षी काही काळ वास्तव्यास येऊ लागले. त्यामधे चित्रबलाक व रोहित पक्ष्यांची संख्या मोठी होती. सुरुवातीला या पक्ष्यांनी इंदापूर येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील झाडांवर विणीच्या हंगामासाठी सारंगार वसविले. त्यानंतर दरवर्षी येथे पक्ष्यांची संख्या वाढू लागली.

हे ठिकाण अपूरे पडू लागल्याने मागील पंधरा वर्षांपासून भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन विस्तीर्ण तलावातील झाडांवर सुरक्षित ठिकाणी हजारोंच्या संख्येने हे पक्षी येऊन सारंगार थाटले गेले.

या सारंगाराची माहिती वृत्तपत्रातून येताच आजवर शेकडो पक्षी निरीक्षकांनी या वसाहतीला भेट दिली आहे. सुमारे चाळीस ते पन्नास एकर परिसरातील तलावातील झाडावर थाटलेले हे चित्रबलाक पक्ष्यांचे सारंगार देशातील सर्वात मोठे ठरले आहे. मात्र गेले तीन चार वष्रे पाऊस कमी झाल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही. परिणामी येथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी झाली.

सद्य:स्थिीत या तलावात पाणी नसल्याने चित्रबलाक पक्ष्यांनी या तलावाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पंधरा वर्षांच्या कालावधीत देशातील सर्वात मोठे ठरलेले हे सारंगार आज ओस पडले आहे. पाण्याअभावी वठून गेलेल्या काटेरी झाडांवर आज तेथे या पक्ष्यांची केवळ विस्कटलेली घरटीच पाहण्यास मिळत आहेत.

Story img Loader