पुणे: वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) आणि वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र (आरसी) नागरिकांना घरपोच मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. नागरिकांना यासाठी टपाल विभागात आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. अखेर दोन्हीकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांना आरटीओतील एजंटाना पैसे देऊन हे काम करून घ्यावे लागत आहे.

वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र आरटीओकडून संबंधित व्यक्तीच्या घरी त्याच्या पत्त्यावर पाठविले जाते. ते मिळाले नाही म्हणून दररोज अनेक नागरिक आरटीओमध्ये चौकशीसाठी येतात. तिथे त्यांना टपाल विभागाकडे असल्याचे सांगितले जाते. नागरिक टपाल विभागातही चौकशीसाठी जातात त्यावेळी आरटीओकडे पाठविल्याचे सांगितले जाते. या सर्व गोंधळात नागरिकांना तब्बल वर्षभरानंतरही परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याचे चित्र आहे.

Queues of citizens, Dombivli Civic Facility Center,
कर्मचाऱ्यांअभावी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Hafkin Corporation has not benefited from ashwasit pragati yojana even after rahul narvekar promise
‘आश्वासित प्रगती’चे आश्वासनच? राहुल नार्वेकर यांना हाफकिनचा विसर पडल्याची कामगारांची खंत
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
Skills training for youth, Skills training youth Maharashtra, Skills training for Israel,
युद्धग्रस्त इस्रायलसाठी राज्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण ! कुशल कामगारांचा तुटवडा असल्याचे कारण
supreme court telecom companies marathi news
दूरसंचार कंपन्यांना थकीत देणींबाबत दिलासा नाहीच!
Ambernath Chemical Gas Leakage
अंबरनाथ शहरात पुन्हा वायू गळती; गुरुवारी रात्री मोरिवली, बी केबिन भागात नागरिकांना त्रास
MHADA Lottery 20 percent of house price given MHADA housing scheme Maharashtra government
२० टक्क्यांतील घरांच्या वाढीव किमतीवर नियंत्रण! प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत

हेही वाचा… राज्यातील दीड कोटी निरक्षर शोधण्याचे लक्ष्य; केंद्र सरकारचे नवभारत साक्षरता अभियान, शिक्षकांवर नवा ताण

अखेर नागरिक आरटीओ एजंटाकडे याबाबत विचारणा करीत आहेत. यानंतर एजंट दोन ते अडीच हजार रुपये घेत आहेत. त्यानंतर नागरिकांना त्यांचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळत आहे. परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच न मिळण्यात चुकीचा पत्ता कारणीभूत असल्याचा दावा आरटीओ आणि टपाल विभागाकडून केला जात आहे. मात्र, मोबाईल क्रमांक त्यावर असताना संबंधित नागरिकाशी संपर्क करून ही कागदपत्रे त्याच्या हवाली का केली जात नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

परिवहन आयुक्तांकडे मागणी

परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र छपाई केंद्राच्या बदललेल्या धोरणाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. राज्यभरात लाखो परवाने व वाहन नोंदणी प्रमाणपत्रे नागरिकांना अद्याप मिळालेली नाहीत. संपूर्ण राज्यात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडे केली आहे.

संबंधित व्यक्तीचा पत्ता सापडला नाही तर असे परवाने आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रे परत आरटीओमध्ये येतात. पत्ता न सापडल्याने ती परत येण्याचे प्रमाण केवळ अर्धा टक्का आहे. लवकरात लवकर नागरिकांपर्यंत ही कागदपत्रे घरपोच पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

पत्ता न सापडल्याने वाहन परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र परत येण्याचे प्रमाण २ ते ३ टक्के आहे. परत आलेली ही कागदपत्रे नागरिकांना देण्यासाठी पुण्यातील मुख्य टपाल कार्यालयात केंद्र सुरू केलेले आहे. तिथून नागरिक त्यांची ही कागदपत्रे घेऊन जाऊ शकतात. आम्ही ही कागदपत्रे पोहोचविण्याला नेहमीच प्राधान्य देतो. – एस.पी. दळवी, व्यवस्थापक, टपाल व्यवसाय विभाग