पुणे : ‘केंद्र शासनाने राज्यातील १२ किल्ल्यांची जागतिक वारसास्थळ म्हणून नोंद व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. युनेस्कोने या किल्ल्यांची वारसास्थळ म्हणून नोंद केल्यास जगभरातील पर्यटक आकर्षित होतील,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे बुधवारी आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘जय शिवाजी जय भारत’ अशा घोषात पदयात्रेचा प्रारंभ शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानातून झाला. या वेळी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, नागरी हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार या वेळी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा