महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपून आठ महिने झाले, तरी आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट होत नाही, यावरून राजकीय वर्तुळात संभ्रमावस्था कायम आहे. सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांमध्येही कमालीची अस्वस्थता आहे.पिंपरी-चिंचवड पालिकेची मुदत मार्च २०२२ ला संपली. निर्धारित कार्यक्रमानुसार त्यानंतरच्या काही दिवसांत आगामी निवडणुका होणे अपेक्षित होते. तथापि, वेगवेगळ्या कारणास्तव गेल्या ८ महिन्यांत या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आणखी किती दिवसांनी निवडणुका होतील, याविषयी खात्रीने काहीही सांगता येत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांचे कामकाज तूर्त थंडावले आहे. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याशिवाय खास निवडणुकांसाठी म्हणून कोणतेही उपक्रम, अभियान राबवण्याच्या मानसिकतेत स्थानिक राजकीय नेते नाहीत.

हेही वाचा >>>पुणे : शहरातील २२५ रस्ते निकृष्ट ; २५ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा पथ विभागाचा प्रस्ताव

Uday Samant claims that Thackeray faction MP Shiv Sena is in touch with Shinde faction
उदय सामंत ‘मिशन टायगर’वर ठाम, म्हणाले दहा ते पंधरा आमदार…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
Navi Mumbai budget likely to avoid tax hikes ahead of upcoming municipal elections
नवी मुंबईकरांना यंदाही ‘करदिलासा’? आगामी पालिका निवडणुकांमुळे अर्थसंकल्पात करवाढ नसण्याची शक्यता
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Ahead of municipal elections Congress office bearers are leaving party in Navi Mumbai
आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षफुटीचे सत्र सुरू, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांची काँग्रेसला सोडचिट्ठी
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

महापालिकेच्या निवडणुका तीन सदस्यीय की चार सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार, ओबीसी आरक्षणांचे काय, असे अनेक मुद्दे राजकीय पक्षांना भंडावत आहेत. तथापि, त्यावर सध्यातरी ठोस उत्तर कोणाकडे नाही. महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणे महत्त्वाची ठरतात. त्यानुसार, बहुतांश इच्छुक उमेदवार आपआपल्या उमेदवारीबाबतचा निर्णय घेत असतात. सध्या काहीच स्पष्ट नसल्याने त्यांच्यासमोर पेच आहे. पिंपरी महापालिकेच्या आखाड्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना होणार असल्याचे चित्र सुरुवातीपासून आहे. निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार मिळावेत, यासाठी दोन्हीही पक्षांच्या नेत्यांचे कसून प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या संभ्रमावस्थेमुळे कोणत्या पक्षाकडे उमेदवारीसाठी जायचे, असा प्रश्न उमेदवारांसमोरही आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग पालिका निवडणुकांबाबत निर्णय घेईल, असे राज्य शासनाकडून अलीकडेच स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader