पुणे : ‘खोटी आश्वासने देऊन मतविभागणी करण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे. काँग्रेसकडून गरिबांचा वापर केवळ मतांसाठी करण्यात येत असून, नंतर त्यांचे शोषण करण्यात येत आहे, असा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी सोमवारी केला. काँग्रेसकडून दिशाभूल केली जात असल्याने सतर्क राहून नागरिकांनी महायुतीला साथ द्यावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.

भारतीय जनता पाक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र केंद्रात सैनी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हरियाणामध्ये भाजपला मिळालेल्या बहुमतामध्ये गरिबांचा मोठा वाटा आहे.

Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Prakash Ambedkar slams Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar: “मनोज जरांगे पाटील यांनीच भाजपाला…”, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप; म्हणाले…
beggar murder news in Pune,update in marathi
पुण्यातील लष्कर भागात भिक्षेकऱ्याची मारहाण करुन हत्या

हेही वाचा – पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार

हेही वाचा – हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई

“तिसऱ्यांदा भाजप सरकारला बहुमत दिले, यात गरिबांचा वाटा मोठा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि हरियाणा निवडणुकीमध्ये महिलांना आणि तरुणांना आश्वासने दिली. मात्र, त्याची पूर्तता केली नाही. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने राज्यघटनेबाबत खोटा प्रचार करून नागरिकांची दिशाभूल केली. काँग्रेसच्या काळात केवळ घोषणा झाल्या, मात्र विकास खुंटला. देशातील गरीब आणखी गरीब झाले. पंतप्रधान मोदींच्या दहा वर्षांच्या काळात गरीब मुख्य प्रवाहात आले. त्यांना सन्मान मिळाला. मोदी यांनी २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले. दहा वर्षांत चार कोटी नागरिकांना घरे दिली. पायाभूत सुविधा, रेल्वे सेवा मजबुतीकरण, विमानतळ विस्तारीकरण, आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण, सीमावर्ती भागात सुरक्षित वातावरण मोदी सरकारने केले. काँग्रेस काळात दहशतवादामुळे लोक भयभीत होते आणि तीच परिस्थिती त्यांना पुन्हा निर्माण करण्याची इच्छा दिसून येत आहे,” अशी टीका सैनी यांनी केली.

Story img Loader