काँग्रेसचे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अवघ्या देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात देखील काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून भाजपविरोधात आंदोलन केले जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरात काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले असून हे सरकार म्हणजे हम दो हमारे दो असे आहे. (नरेंद्र मोदी आणि अमित शहा, अदानी आणि अंबानी) अशी टीका केली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा काम मोदी सरकार करत आहेत असा आरोप देखील त्यांनी केला. पहिले लडे थे गोरे से अब लडेंगे चोरो से अशी घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी दिल्या.

कैलास कदम म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याच काम मोदी सरकार करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. भाजपाचे सरकार येऊन नऊ वर्ष झाली तरी त्यांच्या कार्यकाळात प्रचंड महागाई वाढली आहे. जाती- धर्मामध्ये अराजकता माजवण्याचे काम हे सरकार करत आहे. असा आरोप कदम यांनी केला. पुढे ते म्हणाले की, या देशात केवळ एकच काम सुरू आहे. हम दो हमारे दो, म्हणजे मोदी आणि शहा आणि अदानी आणि अंबानी. याभोवती देशाचं राजकारण सुरू आहे. पुढे ते म्हणाले की, सर्व जाती धर्माचे लोक, शेतकरी यांना एक संघ ठेवण्याचे काम भारत जोडो यात्रेतून राहुल गांधीने केले. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत राहुल गांधींच्या पद यात्रेला भरगोस प्रतिसाद मिळाला म्हणून हे भाजपा सरकार घाबरले आहे. राहुल गांधींमध्ये बलिदानाचे रक्त आहे. काँग्रेसमध्ये बलिदानाची परंपरा आहे. यातून च हा काँग्रेस पक्ष तयार झाला आहे असते म्हणाले आहेत.

कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Jaipur Literature Festival Javed Akhtar statement on dictatorship jaypur
हुकूमशाही संघटनेत कवी जन्माला येत नाही! जयपूर साहित्य महोत्सवात जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवरच बलात्काराचा गुन्हा, पक्षासमोरील अडचणी वाढल्या; हरियाणात राजकीय घडामोडींना वेग (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवरच बलात्काराचा गुन्हा, पक्षासमोरील अडचणी वाढल्या; हरियाणात राजकीय घडामोडींना वेग
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका

तर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले की, राहुल गांधींच्या खासदारकीचे सदस्यत्व रद्द झाले हे पाहता हा देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०२४ ची निवडणूक ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होईल. सरकार च्या विरोधात जो बोलतो तो देशद्रोही ठरतो आहे. अशा पद्धतीने वातावरण या देशात या आगोदर कधीही नव्हते. भारतीय संविधान या गोष्टीना मान्यता देत नाही. पक्ष आणि देश या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षाविरोधात बोललं म्हणजे देशाविरोध बोलणं हे कधी पासून व्हायला लागल? अस म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Story img Loader