पुणे : स्वात्र्यंतोत्तर ‘प्रजासत्ताक भारताचे’ सत्यमेव जयते या अर्थपूर्ण ‘राष्ट्रीय ब्रीद’ सह तयार झालेले बोधचिन्ह हे भारताच्या लोकशाहीरूपी संविधानात्मक वाटचालीची दिशा आणि संकेत दर्शवणारे असून ‘सत्यमेव जयते’ ब्रीद चा उल्लेख नसताना ‘अशोक स्तंभाचे’ अनावरण कसे करण्यात आले, अशी विचारणा काँग्रेसचे राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी यांनी केली आहे.

तिवारी म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर लोकशाहीरुपी भारताची निर्मिती १९४७ ला झाल्यानंतर १९५० मध्ये ‘प्रजासत्ताक भारताची’ जगासमोर ओळख झाली. भारतीय स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, आदींच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांसह घटना-समितीने मोठ्या कालावधीनंतर विचार विमर्षाने संविधान दिले. प्रजासत्ताक भारताचे ‘सत्य मेव जयते’ हे अर्थपूर्ण ब्रीद निश्चित करून, त्यावर ३ सिंहाची प्रतिमा बसवून संविधानाचे बोधचिन्ह दिले. मात्र भाजप नेतृत्वाने मुळात मनमानीपणे हजारो कोटींचा खर्च करून ‘सेंट्रल व्हीस्टा’ च्या रूपाने ‘नवे संसद भवन, पंतप्रधान कार्यालय आणि निवास स्थान’ कोरोना संकट काळातच बांधण्याचा घाट धातला यावर मुळात अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रत्येक बाबतीतच ‘राजकीय श्रेय’ घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्यमेव जयते’ या राष्ट्रीय ब्रीद वाक्याचे वावगे काय आहे, अशी विचारणा तिवारी यांनी केली.

what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
youths Ambernath questions republic day hoardings future corporators
प्रजासत्ताकदिनी तरूणांनी वेधले लक्ष ; प्रजासत्ताक दिनाचे बॅनर का नाहीत, भावी नगरसेवकांना सवाल
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
recruitment of professors loksatta
विश्लेषण : प्राध्यापक भरतीचे होणार काय?
Story img Loader