दावोस दौऱ्यात ४० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप खोटा आहे. या दौऱ्यात ३२ कोटी रुपये खर्च आला आहे. ही परिषद चार दिवसांची होती. येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनला १६ कोटी खर्च आला. या दौऱ्यात एक कोटी ३७ लाख रुपयांचे सामंजस्य करार झाले. २०२२ मध्ये ८७ हजार कोटींचे, तर चालू वर्षी एक लाख ३७ हजार कोटींचे १९ सामंजस्य करार झाले. या माध्यमातून एक लाख रोजगार मिळणार आहेत. ७७ टक्के उद्योजकांना देयकरार पत्र देण्यात आले, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगितले.

हेही वाचा >>> “अजित पवारांबरोबर गेलेले सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात”, जयंत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले, “काहीजण…”

pune district planning committee loksatta news
पुणे : वर्षात अडीच हजार कोटींची कामे, जिल्ह्यासाठी तेराशे कोटींसह ७५३ कोटींच्या अतिरिक्त निधीला ‘डीपीसी’मध्ये मंजुरी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
rahul gandhi mallikarjun kharge (1)
देणग्यांच्या बाबतीतही काँग्रेस पिछाडीवर; वर्षभरात जमा झाला १,१२९ कोटींचा निधी
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
State government approves subsidy of Rs 165 crore for orange producers
संत्री उत्पादकांसाठी १६५ कोटींचे अनुदान, राज्यशासनाची मंजुरी
Crop insurance one rupee, Crop insurance ,
एक रुपयात पीकविमा बंद? बोगस अर्ज, गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस
Pune Municipal Corporation, Mobile Tower ,
साडेतीन हजार कोटींची थकबाकी वसुलीसाठी पुणे महापालिकेने घेतला हा निर्णय !
500 big property tax defaulters property tax arrears worth around 4000 crores
मालमत्ता कराचे ५०० बडे थकबाकीदार, सुमारे ४००० कोटींची थकबाकी

पुणे दौऱ्यावर आल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री सामंत बोलत होते. ते म्हणाले, ‘दावोस दौऱ्यात झालेल्या खर्चाबाबतचा आरोप खोटा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा कोणाच्या ट्विटमुळे नव्हे, तर नागपुरातील प्रचंड पाऊस आणि राज्यातील आंदोलनांमुळे रद्द झाला. कोणी कुणाच्या पैशांवर दौरे केले, हे गेल्या २५ वर्षांचे काढवे लागेल.’

दरम्यान, ठाकरे सरकारच्या काळात १४ महिने मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक न झाल्याने रोजगार बुडाले. मात्र, आता महायुती सरकारच्या काळात तिमाहीत आपले राज्य गुंतवणुकीत अग्रणी राहील. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जातील. महायुतीला लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा मिळतील. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही जागावाटपाबाबत योग्य निर्णय घेतील. तिन्ही नेत्यांना राज्याची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती माहिती आहे. शिवसेनेच्या कोणत्या नेत्याला कुठे उमेदवारी द्यायची, हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री शिंदे यांनाच असेल, असेही सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे: धायरीत तीन कारखान्यांना आग

शिवसेना केवळ बाळासाहेबांची! शिवसेना ही जशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वडिलांची नाही, तशीच ती इतरही कुणाच्या वडिलांची नाही. ती केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि त्यांच्या विचाराचे खरे वारस आम्ही आहोत, असेही उद्योग मंत्री सामंत यांनी या वेळी सांगितले.

Story img Loader