पुणे : महाराष्ट्राची वेगाने प्रगती होत असताना शेजारील कर्नाटक राज्य कर्जबाजारी झाले आहे. ‘आयटी हब’ असलेल्या बंगळुरु शहराच्या विकासासाठी सरकारकडे पैसा शिल्लक नाही. चुकीचे सरकार निवडून दिल्यानंतर काय परिणाम होतात, हे यातून दिसत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका केली.

खोटय़ा आणि चुकीच्या घोषणा देऊन सरकारने तिजोरीला हात घातला आहे. कर्नाटकप्रमाणेच राजस्थानही कर्जबाजारी झाले असून, विकासकामे ठप्प झाली आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला. पुणे शहरातील वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते चाव्या देण्यात आल्या. तसेच  पिंपरी-चिंचवड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला.

BJP challenges Ajit Pawar group MLA Sunil Shelke in Maval
मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
Ajit Pawar demand to BJP regarding the post of Chief Minister print politics news
मुख्यमंत्रीपद ‘फिरते’ हवे? अजित पवार यांची भाजपकडे मागणी
Party President Mallikarjun Kharge met by Nana Patole Print politics news
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला; नाना पटोलेंकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट
Siddaramaiah
Siddaramaiah : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना MUDA प्रकरण भोवणार? राज्यपालांचा आदेश न्यायालयाने कायम ठेवल्याने सिद्धरामय्या अडचणीत
the cabinet is angry at the behavior of the officials Mumbai
अधिकाऱ्यांच्या चालढकलीवर मंत्रिमंडळाचा संताप
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?

ते म्हणाले, देशाच्या प्रगतीमध्ये राज्याचा मोठा वाटा आहे. त्याचा फायदा पुण्याला होत आहे. राज्याची प्रगती वेगाने होत असताना शेजारील कर्नाटकमध्ये बेंगलुरू शहराच्या विकासासाठी पैसे नाहीत. पक्षस्वार्थासाठी तिजोरीला हात घातला जातो, तेव्हा त्याचा युवा पिढीच्या भवितव्यावर परिणाम होतो. चुकीचे सरकार निवडून दिल्यानंतर त्याचे परिणाम कर्नाटकमध्ये दिसत आहेत. हीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे.