पुणे : महाराष्ट्राची वेगाने प्रगती होत असताना शेजारील कर्नाटक राज्य कर्जबाजारी झाले आहे. ‘आयटी हब’ असलेल्या बंगळुरु शहराच्या विकासासाठी सरकारकडे पैसा शिल्लक नाही. चुकीचे सरकार निवडून दिल्यानंतर काय परिणाम होतात, हे यातून दिसत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका केली.

खोटय़ा आणि चुकीच्या घोषणा देऊन सरकारने तिजोरीला हात घातला आहे. कर्नाटकप्रमाणेच राजस्थानही कर्जबाजारी झाले असून, विकासकामे ठप्प झाली आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला. पुणे शहरातील वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते चाव्या देण्यात आल्या. तसेच  पिंपरी-चिंचवड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला.

Budget, BJP, Democracy, Constitution,
समोरच्या बाकावरून : ओसाडगावची हाळी…!
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
pune city real estate projects Housing projects
सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
girish kuber
जुनी करप्रणाली अप्रत्यक्ष मोडीतच;‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात तज्ज्ञांचे मत

ते म्हणाले, देशाच्या प्रगतीमध्ये राज्याचा मोठा वाटा आहे. त्याचा फायदा पुण्याला होत आहे. राज्याची प्रगती वेगाने होत असताना शेजारील कर्नाटकमध्ये बेंगलुरू शहराच्या विकासासाठी पैसे नाहीत. पक्षस्वार्थासाठी तिजोरीला हात घातला जातो, तेव्हा त्याचा युवा पिढीच्या भवितव्यावर परिणाम होतो. चुकीचे सरकार निवडून दिल्यानंतर त्याचे परिणाम कर्नाटकमध्ये दिसत आहेत. हीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे.

Story img Loader