पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील पुढील दहा वर्षांतील कामकाजाचे नियोजन करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर १३ तालुक्यांतील प्रत्येकी एका गावात हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. गावांच्या विकासासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत पुढील दहा वर्षांच्या कामांचा नियोजनबद्ध आराखडा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार असल्याने लवकरच गावांचा कायापालट होणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या माध्यमातून ग्रामपातळीवर शाश्वत विकास व्हावा, बेरोजगारांना रोजगार मिळावा. जल, जंगल, माती संवर्धनाबरोबर गावांमध्ये विहिरी, शेती, तळे, शेतीसुधारणा, पर्यटन विकास यांसारखी कामे होऊन गावे समृद्ध व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायत स्तरावर ‘दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

1511 unauthorized constructions on 276 acres in Kudalwadi demolished
कुदळवाडीतील २७६ एकरवरील १ हजार ५११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
MHADA to release 629 houses in Mumbai Mandal on February 16 mumbai news
पत्राचाळीतील घरांचा ताबा; म्हाडाच्या मुंबई मंडळातील ६२९ घरांसाठी १६ फेब्रुवारीला सोडत
new building construction hearing thane Municipal Corporation tree cutting Raymond company
रेमंड येथील वृक्षतोडी संदर्भात महापालिकेत सुनावणी
Redevelopment Building Permit Terms and Conditions
एकाचा पुनर्विकास दुसऱ्याला नसावा त्रास
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन

याबाबत बोलताना रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. वनश्री लाभशेटवार म्हणाल्या, ‘जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर १३ तालुक्यांमधील एका गावाची निवड करून ग्रामपातळीवर पाणंद रस्त्यांपासून, शेततळे, नाला सरळीकरण, जलसंधारण, पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करणे, तलावातील गाळ काढणे, गुरांचा गोठा, शासकीय बांधकाम, फळबाग-रेशीम-तुती लागवड, सिंचन विहिर, शोषखड्डे, अंगणवाडी शाळा, घरकुल विकास योजनेतील कामे, भौतिक विकासासंदर्भातील तब्बल २६२ प्रकारची कामे करण्यासाठीचे नियोजन सुरू आहे. यापैकी काही कामांना सुरुवात करण्यात आली आहे.’

खासकरून रोहयोतून वैयक्तिक लाभाच्या योजनांना सर्वात जास्त मागणी असली, तरी त्यातून गावचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच स्थानिक पातळीवरच रोजगार प्राप्त होत असून ग्रामसेवक, तलाठी, गट विकास अधिकारी यांनी वेळोवेळी ग्रामसभा घेण्यात येत आहेत. तसेच दर चार दिवसांनंतर आढावा बैठक घेऊन कामांचा देखील आढावा बैठका घेण्यासंदर्भातही आदेश दिले आहे, असेही डॉ. लाभशेटवार यांनी सांगितले.

प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पासाठी निवडलेली गावे

आंबेगाव – आहुपे, भोर – सालुंघन, जुन्नर – आंबी, बारामती – जळगावसुपे, इंदापूर – जाधववाडी, दौंड -खोर, खेड – मोरगीरी, मावळ – शिळींब, मुळशी – भांबर्डी, पुरंदर – कोंदे, शिरूर – खैरेनगर, वेल्हा – कोळंबी आणि हवेली – आळंदी म्हातोबा.

गावांचा विकास व्हावा, सुविधा पोहोचाव्यात, स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा हा हेतूने दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असणाऱ्या १३ गावांचा आढावा घेऊन हळूहळू विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  – डॉ. वनश्री लाभशेटवार, उपजिल्हाधिकारी, रोहयो

Story img Loader