देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मजबूत आहोत. काही काळजी करू नका. एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर परिणाम होणार नाही. ही युती एवढी कच्ची नाही. आम्ही आणि देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहोत. अस विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी लक्ष्मण जगताप, उमा खापरे, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पालिका आयुक्त शेखर सिंह यासह इतर नागरिक, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत मी नालेसफाई झाली की नाही हे अगदी स्पॉटवर जाऊन बघतो. राज्यात कुठं ही गाडी थांबव म्हटलं तरी रस्त्यावर थांबून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पहिला आहे काय का? असे एकनाथ शिंदे यांनी म्हणत अप्रत्येक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले, कोरोना काळातील सर्व निर्बंध उठवले. घाबरून घाबरून राहिलो असतो तर कोरोनाने आपल्याला धरलं असतं. आपण राज्यात सर्व सण- उत्सव खुले केले. त्यामुळं कोरोना पळून गेला.
मला इगो नाही रस्त्यावरील कार्यकर्ता आहे. माझं आणि सरकारच एकच काम आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे. हे सरकार शेतकऱ्यांच आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. पुढे ते म्हणाले, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. हे सरकार खोटं नाही. मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत मी नालेसफाई झाली की नाही हे अगदी स्पॉटवर जाऊन पाहतो. राज्यात कुठं ही गाडी थांबव म्हटलं तरी रस्त्यावर थांबून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पाहिलंय का? पूर्वीच सरकार हे घरी होतं. आम्ही मात्र दारी येऊन काम करतो आहोत. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही बजबुत आहोत. ही युती एवढी कच्ची नाही.