पुणे: मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही पूर्वीची आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे या मागणीला धार मिळालेली आहे. मराठा समाजाची मागणी लवकरात लवकर राज्य आणि केंद्र सरकारने पूर्ण करावी, मराठा समाजाच्या तरुणांचा सरकारने अंत पाहू नये असा घनघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांना मराठा समाजाच्या संघटनांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला, यावर बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा विरोध नाही. मी देखील त्या आंदोलनातील एक कार्यकर्ता आहे, असं म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आणखी वाचा-परीक्षा शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा हिवाळी अधिवेशनावर दणका मोर्चा

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
supreme court on illegal foreign nationals in India
मुहूर्ताची वाट पाहता का?’ सर्वोच्च न्यायालयाकडून आसाम सरकारची कानउघाडणी
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!

अंबादास दानवे म्हणाले, माझा विरोध झालेला नाही, मी ही त्या आंदोलनातील एक कार्यकर्ता आहे. मी त्यांना भेटण्याच्या तयारीत होतो. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल भूमिका मांडलेली आहे. मी मराठवाडा येथील आहे. जरांगे पाटलांच्या नेहमीच संपर्कात असतो. आंदोलक आक्रमक आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. मराठा आरक्षणाची मागणी ही जुनी आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे या आंदोलनाला, मागणीला धार आली आहे. मराठा समाजाच्या तरुणांचा सरकारने अंत पाहू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवली तर आरक्षण मिळू शकत. राज्य आणि केंद्रसरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. कृषी विषयी नऊ वर्षात पंतप्रधानांनी काय केले हे उत्तर त्यांनी द्यायला हवं.

Story img Loader