इंदापूर: जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील संभाव्य समस्यांवर सखोल उहापोह या परिषदेत केला जाणार असून, त्यांचे निराकरण करण्यासंदर्भातही सामूहिक विचारमंथन होणार आहे. त्यामुळे दुबई साखर परिषद ही जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक ठरणार आहे .असे प्रतिपादन भारताच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी  केले.

दुबई येथे सोमवार १० ते गुरुवार दि१३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जागतिक साखर उद्योगाची नववी दुबई साखर परिषद २०२५ चालु झाली आहे.या दुबई साखर परिषदेमध्ये भारताच्या साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अंकिता पाटील- ठाकरे, निहार ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच भारत सरकारचे सचिव दर्जाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या शुगर परिषदेमध्ये जगातील सुमारे ७० देशातील साखर उद्योगाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.

Harshvardhan Patil Chief Minister Tamil Nadu M.K.Stalin Chennai sugar industry
हर्षवर्धन पाटील व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांची भेट, चेन्नई येथील भेटीत साखर उद्योगावर संवाद
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
india is able to adapt to changing conditions of trade to remain strong in global market in future as well
जागतिक साखर बाजारपेठेत भारताची महत्वाची भूमिका, हर्षवर्धन पाटील कॉफको इंटरनॅशनल परिसंवाद
Adv Manik Kokate assures that he will be on farm embankment to solve problems of farmers
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बांधावर, नाशिक कृषी महोत्सवात ॲड. माणिक कोकाटे यांचे आश्वासन
Sugar Commissionerate is committed to go above and beyond to ensure human rights of sugarcane workers
ऊसतोड कामगारांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, साखर आयुक्त कुणाल खेमनर यांची ग्वाही
China obstacle to becoming the world manufacturing hub
जगाचे उत्पादन केंद्र बनण्यात चीनचा अडसर
Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, दुबई शुगर परिषदेमध्ये डिजिटल शेती, ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार, पाण्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक संकल्पना, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी भांडवल जमवणे, साखरेच्या आरोग्यासंदर्भातील चुकीच्या अफवा, तापमान वाढीची चिंता या संदर्भात चर्चा होणार आहेत. जागतिक तापमान हे एक अंश पेक्षा अधिक सेल्सिअसने वाढलेले आहे. सन २०२४ हे वर्ष उच्चांकी उष्णतेचे ठरले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार जागतिक तापमान वाढ होत राहणार आहे. तसेच येऊ घातलेली संभाव्य  मंदी, वातावरणातील बदल, डॉलरची ताकद आदि संदर्भातही चर्चा या परिषदेत होईल.

जगामध्ये प्रगत अर्थ व्यवस्थांमधील आर्थिक आणि वित्तीय धोरणे जगाला मंदीकडे आणि दीर्घकाळापर्यंत स्तब्धतेकडे ढकलण्याचा धोका आहे, असे सध्या बोलले जात आहे. त्यामुळे २००८ मधील आर्थिक संकट आणि २०२० मधील कोविड-१९ पेक्षा साखर उद्योगाचे  अधिक नुकसान होऊ नये म्हणून सतर्कता बाळगणे संदर्भातील विषयावर या परिषदेत चर्चा होईल. साखर उद्योगातील तंत्रज्ञान, आधुनिकता, साखर व्यापार, साखर उद्योगा पुढील आव्हाने या संदर्भात जगातील साखर उद्योगातील तज्ञ या परिषदेत विचार मांडणार आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

Story img Loader