पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालख्यांच्या पुणे मुक्कामावेळी यंदा शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याला पाणीटंचाईचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा कमी असल्याने दोन दिवस चोवीस तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याऐवजी टँकरची संख्या वाढवून पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विचाराधीन आहे. मात्र त्याबाबतचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

हेही वाचा >>> जालना : सोसायटी निवडणुकीत काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल पराभूत

pratapgad mashal Mahotsav
किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव; राज्यभरातील शिवभक्तांची उपस्थिती
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Nitin Gadkari appeal on achieving higher economy sangli
उच्च अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा; नितीन गडकरी यांचे आवाहन
gold-plated prabhawal offered to Mahalakshmi
कोल्हापूर : सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ महालक्ष्मीला अर्पण
sambhaji bhide criticized hindu community for making events of ganesh and navratri festival
हिंदू जगातील महामूर्ख जमात – संभाजी भिडे; गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे ‘इव्हेंट’ झाल्याची टीका
sambhajinagar ganesh mandal fight marathi news,
छत्रपती संभाजीनगर: गणेश मंडळांमधील वाद, तरुण अत्यवस्थ; मुलाच्या परिस्थितीस पोलीस कारणीभूत, पित्याचा आरोप
Navy program Malvan, Sindhudurg district planning,
मालवण येथील कार्यक्रम नौदलाचा, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून साडेपाच कोटींचा खर्च का केला? – आमदार वैभव नाईक
Ganesh Visarjan 2024 Live Update in Marathi
Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला असला तरी अद्याप तो सक्रिय झालेला नाही. त्यातच वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आणि तशी चाचपणी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> ‘जे बाळासाहेबांचे विचार विसरले तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील,’ सुधीर मुनगंटीवार यांचे विधान

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या येत्या बुधवार आणि गुरुवार (२२ जून, २३ जून) रोजी पुणे मुक्कामी आहेत. त्यानंतर शुक्रवारी (२४ जून) पालख्यांचे प्रस्थान होईल. पालखी मुक्कामी असताना दहा ते बारा लाख वारकरी पुण्यात दाखल होतात. वारकऱ्यांना विविध आरोग्यविषयक सुविधा देताना महापालिकेकडून पालख्या मुक्कामी असताना चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन वर्षांचा अपवाद वगळता यापूर्वी पालखी मुक्कामावेळी चोवीस तास अखंड पाणीपुरवठा करण्यात आला होता. तसेच खडकवासला साखळी प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. यंदा मात्र पाणीटंचाईचा फटका पालखी मुक्कामाला बसण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> “तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की आईचं दूध विकणारा…”, उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण!

खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणातील पाणीसाठी कमी झाला असून तो तीन अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे पंधरा जुलै पर्यंतचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेकडून प्रतिदिन १ हजार ६०० दशलक्ष लिटर (एमएलडी) एवढे पाणी घेतले जात आहे. त्यानंतरही शहराच्या अनेक भागांना विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदा चोवीस तास पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकतता आहे.

हेही वाचा >>> मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थानं करुन राज्य चालवता येत नाही – संजय राऊत

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी महापालिका पाण्याचे वीस टँकर पंढरपूरपर्यंत पाठविणार आहे. मात्र पुणे मुक्कामावेळी दैनंदिन वेळेपेक्षा थोडा जास्त काळ पाणी सोडण्यात येणार आहे. पालख्यातील दिंड्या ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजित आहे. काही भागात तात्पुरती नळजोड उभारण्याचेही नियोजित आहे. अनेक ठिकाणी टँकरची संख्या वाढविण्यात येणार आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नसून तो येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.