पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नाकाबंदीत मुंबईहून पुण्यातील सराफ व्यावसायिकांना पाठविण्यात आलेले चार कोटी १६ लाख रुपयांचे चार किलो चांदी, तसेच एक कोटी ५७ लाख रुपयांचे दोन किलो असा ऐवज जप्त करण्यात आले. पोलिसांनी याबाबतची माहिती प्राप्तीकर विभाग, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागातील अधिकाऱ्यांना दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या वेगवेगळ्या भागात नाकाबंदी लावण्यात आली आहे. ओैंध येथील राजीव गांधी पुलावरुन शनिवारी सकाळी एक वाहन पुण्याकडे निघाले होते. नाकाबंदीतील पोलिसांनी वाहन तपासणीसाठी अडवले. तपासणीत वाहनात चार किलो ४७९ ग्रॅम चांदी आणि दोन किलो ५११ ग्रॅम सोने सापडले. जप्त केलेल्या सोन्या चांदीचे किंमत पावणेसहा कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

new building construction hearing thane Municipal Corporation tree cutting Raymond company
रेमंड येथील वृक्षतोडी संदर्भात महापालिकेत सुनावणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
census delay by Modi government due to low fund provision
जनगणना आणखी लांबणीवर? १२ हजार कोटींची गरज असताना केवळ ५७५ कोटींची तरतूद
contractors warn to stop work for rs 90 thousand crores outstanding of development works during the election period
निवडणूक काळातील विकासकामांची ९० हजार कोटींची थकबाकी; कामे थांबविण्याचा ठेकेदारांचा इशारा
४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार

हेही वाचा >>>“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?

पोलिसांनी चैाकशीसाठी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले सोने आणि चांदी शहरातील सराफ व्यावसायिकांना देण्यात येणार होते. याप्रकरणी प्राप्तीकर विभाग, तसेच वस्तू आणि सेवा कर विभागातील अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. एका कुरिअर कंपनीमार्फत पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर येथील सराफ व्यावसायिकांना सोने, चांदी पोहचिवण्यात येणार असल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची नोंद चतु:शृंगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहर, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहकारनगर भागातून तब्बल १२८ कोटी रुपयांचे सोने नुकतेच जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी नाकांबदी दरम्यान पकडलेले सोने शहरातील सराफ व्यावसायिकांचे होते. त्यांनी मुंबईतील कारागिरांकडून सोन्याचे दागिने घडवून आणले होते.

Story img Loader