पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना राज्य सरकारने रडीचा डाव खेळत नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्यातील २४ महापालिका आयुक्तांना दिले. ही बाब सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुका घेण्यास घाबरत असल्याने निवडणुकांना विलंब होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

हेही वाचा >>> कर्नाटक सरकारच्या दडपशाहीसमोर महाराष्ट्र सरकार कमी पडतंय का? मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
Girish Mahajan, High Court, Girish Mahajan news,
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
Ramdas Athawale, Shivaji maharaj statue, sculptor,
शिव पुतळा उभारण्याचे काम नवख्या शिल्पकाराला देणं चुकीचं होतं – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
hunger strike for Vidarbha, politics Vidarbha,
नेते राजकारणात व्यग्र, विदर्भ राज्यासाठी उपोषणकर्ती रुग्णालयात

गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील २४ महानगरपालिका, २७ जिल्हा परिषद, ३५० पंचायत समिती आणि ३५० नगरपालिका यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या सर्वच ठिकाणी प्रशासक राज्य आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणी २८ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होऊन निकाल येणे अपेक्षित आहे. असे असताना, राज्य सरकारने रडीचा डाव खेळत नव्याने प्रभाग रचना करण्याबाबत राज्यातील २४ महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिलेला आदेश हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे सर्व पुराव्यानिशी सर्वोच्च न्यायालयाच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> पुणे विद्यापीठावर भाजपचेच वर्चस्व; महाविकास आघाडीला एकच जागा

येत्या २८ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय तातडीने निवडणुका घेण्याच्या आदेश देईल याबाबत विश्वास आहे. मुळातच १४ जून रोजी न्यायमूर्ती खानविलकर यांनी असलेल्या प्रभाग रचनेनुसार पंधरा दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुका घेण्यास घाबरत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब होत आहे. लोकशाहीच्या रचनेत निवडणुकींना विशेष महत्त्व असून नागरिकांना त्यांचे हक्काचे लोकप्रतिनिधी निवडण्यापासून वंचित ठेवत लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार शिंदे-फडणवीस सरकार करत असल्याची टीकाही जगताप यांनी केली.