लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहित लागू होण्यापूर्वी सनदी अधिकारी आणि राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. मात्र, अनेक बदल्या करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे नियम, निकष पायदळी तुडविण्यात आल्याच्या तक्रारी होत आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दणका देत १०९ अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत.

Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
article about ineffective laws against rape due to lack of implementation
कायदे निष्प्रभच…
Mahavikas aghadi decision to hold a silent protest across the state to protest the Badlapur sexual assault case Print politics news
मूक आंदोलनातून सरकारची कोंडी? बंदला मज्जाव केल्यानंतर मविआचा नवा पवित्रा
Mumbai, Badlapur Case,Suspended police Officer, Shubhada Shitole Shinde Transferred , assembly elections, police transfers, senior police inspectors
बदलापूर प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे- शिंदे यांच्यासह ठाण्यातील १४ पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
UPSC lateral entry
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?

बदल्या करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे नियम, निकष यांचे पालन करण्यात आले नसल्याच्या तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या होत्या. तसेच अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली होती.

आणखी वाचा-पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने केला ‘हा’ खुलासा

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करताना नियम, निकषांचे पालन न केल्याने अनेक अधिकारी मॅटमध्ये गेले होते. याबाबत मॅटने केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या अनुषंगाने बदली करतानाचे नियम, निकष तपासून पाहण्याची विनंती केली होती. अशी २२५ प्रकरणे आयोगाकडे दाखल झाली होती. या प्रकरणांची छाननी केल्यानंतर १०९ बदल्या नियम, निकषानुसार झाल्या नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब मॅट आणि राज्य शासनाला कळविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणांत नियमाप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे.’