लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरातील नागरिकांना समान पाणी मिळावे, यासाठी सात वर्षापूर्वी सुरू झालेल्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्यानंतरही ही योजना पूर्ण होत नसल्याने हे प्रशासनाचे अपयश असल्याची टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली. या योजनेला वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही आतापर्यंत या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम पूर्ण होण्यासाठी पुढील काही वर्षांची वाट पहावी लागणार असल्याचे वेलणकर यांनी सांगितले. ‘समान पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक त्या पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून महापालिकेला २५० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा