लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून उत्सव मित्र मंडळाने सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी येथे आलेल्या पुरामुळे घराचे नुकसान झालेल्या पांडुरंग त्रिंबक मानवदकर यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. नवी पेठेतील गांजवे चौक येथील उत्सव मित्र मंडळाने जिवंत देखाव्यातून पुण्याचा वारसा जपण्याचे आवाहन केले आहे.

scene of Utsav Ganeshacha aadar Stree Shakticha based on education concept of teacher Swati Deshmukh
‘उत्सव गणेशाचा आदर स्त्री शक्तीचा’ ज्यांच्या कार्यावर देखावा त्यांच्याच हस्ते उद्घाटन
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sarsangchalak Dr Mohan Bhagwat presented his views on Hinduism
‘हे खा’, ‘ते खा’ सांगणे म्हणजे धर्म नव्हे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
oil and gas reserves found in the sea of ​​Pakistan how equation can change for Pakistan
पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sushilkumar shinde
Sushilkumar Shinde : “मी तेव्हा जम्मू-काश्मीरला जायला घाबरलो होतो”, सुशीलकुमार शिंदेंचं विधान चर्चेत

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, उद्यम विकास सहकारी बँकचे संचालक दिनेश भिलारे, अनंत घरत, पत्रकार संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत मानवदकर यांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष सुधीर काळे, अध्यक्ष अतुल धर्मे, सचिन गायकवाड, विनय कदम, सुमित काळे, विजय लोणकर, तुषार सस्ते, सुनील वाबळे, धनंजय लोणकर, प्रतीक काळे, बाळासाहेब कांबळे, शैलेश कदम, अनिल तापकीर, आकाश खराटे या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’ची घोषणा… कधी होणार परीक्षा, अर्ज कधीपासून उपलब्ध?

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये मंडळाने ‘वारसा पुण्याचा, पुन्हा जपूया’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. विद्येचे माहेरघर ते वाहतुकीचे शहर, गुन्हेगारी-व्यसनांचे आगर अशी पुण्याची बदललेली ओळख ही व्यथा या जिवंत देखाव्यात मांडली आहे. जुन्या पुण्याची सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या देखाव्यातून करण्यात आले आहे. जिवंत देखाव्याची संकल्पना संतोष शिकरे यांची आहे. उत्सव मित्र मंडळची स्थापना १९७२ साली झाली असून मंडळ दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून हा निधी विविध सामाजिक उपक्रमांवर खर्च करत असते, असे मंडळाचे कार्याध्यक्ष सुधीर काळे यांनी सांगितले.