फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच उत्तर भारतातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान वाढीमुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने तातडीने समितीची स्थापना करून तापमान वाढीचा परिणाम काय होईल, याचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय पीक पूर्वअंदाज केंद्राने (एनसीएफसी) फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच उत्तर भारतात तापमान सरासरी ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते, त्याचा परिणाम म्हणून अंतिम टप्प्यात असलेल्या गव्हाच्या पिकावर होऊन उत्पादनात घट येण्याचा अंदाज व्यक्त केला होता.मध्य प्रदेशाचा अपवाद वगळता उत्तर भारतात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातील तापमान मागील सात वर्षांच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे निरीक्षणही केंद्राने नोंदविले आहे. त्यासह गुजरात, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
Loksatta bookmark My Father Brain A Life in the Shadow of Alzheimer Sandeep Johar
बुकमार्क: विस्मृतीच्या अंधारातील धडपड…
decrease in gold prices todays gold rate Nagpur news
सोन्याच्या दरात घसरण…लाडकी बहीणींचा आनंद द्विगुनीत…
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक

या बाबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा म्हणाले,की तापमान वाढल्यानंतर सूक्ष्म सिंचनाद्वारे गव्हाला पाणी देण्याचे निर्देश शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तापमान वाढीचा कल लक्षात घेऊन पुढील काळात गव्हाची लागवड लवकर करणे, कमी दिवसांत तयार होणाऱ्या गव्हाची लागवड करणे आणि तापमान वाढीचा परिणाम न होणाऱ्या गव्हाच्या वाणांचा विकास करून त्याची लागवड करणे आदी पर्यायांवर गांभीर्याने विचार सुरू आहे.

यंदा गहू उत्पादनाची स्थिती काय?
२०२२-२३च्या यंदाच्या हंगामात देशाचे गहू उत्पादन ११.२१ कोटी टन होण्याचा केंद्र सरकारचा अंदाज आहे. मागील वर्षी काही गहू उत्पादक राज्यांमध्ये तापमान वाढ झाली होती, त्याचा परिणाम म्हणून गहू उत्पादनात घट होऊन उत्पादन १० कोटी ७७.४ लाख टन झाले होते. त्याचा परिणाम निर्यात आणि दरवाढीवर झाला होता.

तापमान वाढीचा गव्हाच्या उत्पादनावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत कृषी मंत्रालयाचे अधिकारी, कर्नाल येथील गहू संशोधन केंद्रातील संशोधक आणि संबंधित राज्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. – मनोज आहुजा, सचिव, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय