पुणे: चेन्नईहून पुण्याला येणाऱ्या भारत गौरव यात्रेच्या गाडीमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. सर्व ४० प्रवाशांवर ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने उपचार केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. आता सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नईहून पुण्याला येणा-या भारत गौरव यात्रेदरम्यान अनेक प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली. तपासणीत प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले. ही प्रवाशांनी बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मध्यरात्री रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. तात्काळ ससून रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांनी उपचारासाठी रेल्वे स्थानकावर धाव घेतली.

हेही वाचा… ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचे भुजबळांना आव्हान : म्हणाले, ‘भुजबळांनी राजीनामा देऊन मैदानात…’

विषबाधा झालेल्या ४० प्रवाशांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. रेल्वे प्रशासन आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. रेल्वे गाडीत खाद्यपदार्थांची सेवा देणा-यांची चौकशी केली जात आहे. याचबरोबर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणी साठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food poisoning among 40 railway passengers in bharat gaurav yatra train pune print news stj 05 dvr