कार्तिकी एकादशी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी येथे जाण्यासाठी पीएमपीकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारपासून (१७ नोव्हेंबर) बुधवारपर्यंत (२३ नोव्हेंबर) ही सेवा उपलब्ध असणार आहे. आळंदीसाठी नियमित मार्गावर धावणाऱ्या ९७ आणि जादा २०३ अशा एकूण ३०० गाड्या धावणार आहेत. दरम्यान, शनिवारपासून (१९ नोव्हेंबर) मंगळवार पर्यंत (२२ नोव्हेंबर) रात्री आवश्यकतेनुसार बससेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

स्वारगेट, हडपसर, पुणे रेल्वे स्थानक, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगांव, भोसरी, रहाटणी बसस्थानाकातून या गाड्या सुटणार आहेत. यात्रेसाठी रात्री बारा वाजल्यानंतर जादा गाड्यांसाठी (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) नियमित तिकिटापेक्षा पाच रुपये जास्त आकारले जाणार आहेत.

Unreserved special trains, Mumbai - Kudal,
मुंबई – कुडाळदरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
AC local trains, central railway, railway passengers
मध्य रेल्वे मार्गावर आज ‘वातानुकूलित’ऐवजी ‘विनावातानुकूलित’ लोकल, प्रवाशांच्या गोंधळात भर
The terminal in Nigdi of PMP will be demolished for the metro station
मेट्रो स्थानकासाठी ‘पीएमपी’च्या निगडीतील ‘टर्मिनल’वर हातोडा
Kharkopar to Uran railway line, Cleaners employment,
स्थानक सफाईवरून रेल्वे-सिडको यांच्यात टोलवाटोलवी, सफाई कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत
badlapur rail roko local Diversion
Badlapur Protest : बदलापूरच्या आंदोलनाचा मुंबई लोकल व एक्सप्रेसला फटका, रेल्वेगाड्या ‘या’ मार्गावर धावतायत, मुंबईकरांसाठी काय व्यवस्था?
41 thousand for one tree of Metro Mumbai news
‘मेट्रो’च्या एका झाडासाठी ४१ हजार खर्च
Sawantwadi Road Terminus, Deepak Kesarkar,
सिंधुदुर्ग : सावंतवाडी रोड टर्मिनसवर रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी, आंदोलनाला मंत्री दिपक केसरकरांचा प्रतिसाद

हेही वाचा: द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी २४ तास वाहन तपासणी; परिवहन आयुक्तांचे आदेश

पीएमपी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसी, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य पासधाराकांना यात्रा कालावधीत रात्री बारानंतर पासचा वापर करता येणार नाही. महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यामधून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे काही मार्गावरील बससेवेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आळंदी येथे जाणारी भोसरी ते पाबळ आणि आळंदी ते मरकळ हे दोन मार्ग यात्रा काळात पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.