पुणे : हिमालयातील जोशीमठ हे ठिकाण पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. या ठिकाणच्या नैसर्गिक मर्यादांवर झालेल्या मानवी अतिक्रमणामुळे शहर खचण्याचा प्रकार होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले असून, राज्यात पाचगणीसारख्या ठिकाणांची रचनाही जोशीमठाप्रमाणेच असल्याचे वास्तव तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे, या भागातही जागरूक राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

हिमालयात दरडी कोसळून स्थिर झाल्यानंतर तयार झालेली ठिकाणे आहेत. जोशीमठ त्यापैकीच एक आहे. कोसळलेल्या दरडीच्या खाली खडक असल्यास पाया चांगला असतो. मात्र, जोशीमठमध्ये अशी परिस्थिती नाही. तेथील सांडपाण्याची व्यवस्था चांगली नाही. त्याशिवाय चारधाम यात्रेसाठी रस्ता करणे, ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पासाठी बोगदा तयार करणे, बांधकामांचे बेसुमार अतिक्रमण याचा फटका जोशीमठला बसला आहे. जोशीमठ शहराच्या खाली असलेला पाया ठिसूळ होऊन शहर खचत असल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढल्याचा ताणही निर्माण झाला आहे. विकासकामे करताना मिश्रा समितीच्या अहवालातील शिफारशींचे पालन झाले नाही. त्यामुळे, जोशीमठ शहर खचण्यामागे नैसर्गिक कारणांसह मानवी हस्तक्षेप हेही महत्त्वाचे कारण असल्याचे ज्येष्ठ भूशास्त्रज्ञ आणि हिमालयाचे अभ्यासक डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!
Protesters demand that Vishalgad should be cleared of encroachments and dargah should be removed
विशाळगड अतिक्रमणमुक्त करत दर्गा हटवा; आंदोलकांची मागणी
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
JNPA Workshop on Green Port Initiative
जेएनपीएची हरित बंदराकडे वाटचाल; बंदर परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम

काळाची गरज म्हणून काही विकासकामे करणे आवश्यक आहे. मात्र, विकासकामे करताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. गावे स्थलांतरित करणे हा उपाय होऊ शकत नाही. शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवूनच काम करण्याची गरज असल्याचेही डॉ. करमळकर यांनी नमूद केले.

पाचगणीची स्थिती काय?

जोशीमठप्रमाणेच राज्यात पाचगणीसारख्या ठिकाणची रचना बरीच समान आहे. जमिनाचा आतला ठिसूळ भाग मोठा पाऊस झाल्यास किंवा सांडपाण्यानेही वाहून जातो. २००५ मध्ये अतिपावसामुळे भिलारमध्ये दरड कोसळली होती. त्यावेळी शासनाने नेमलेल्या समितीमध्ये काम करून अहवाल सादर केला. त्यानंतर काही गावांचे स्थलांतर करण्यात आले. पाचगणीचा भाग कोयनेच्या खोऱ्यात येतो. गेल्या काही वर्षांत पाचगणीमध्येही पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. त्यामुळे, जोशीमठची परिस्थिती पाहता पाचगणी परिसराबाबतही जागरूक राहण्याची गरज आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

Story img Loader