उजव्यांमधला डावा, अशी ओळख असणाऱ्या गिरीश बापट यांनी आयुष्यभर सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय मैत्री केली. ती मैत्री राजकारणाने डागाळली जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळेच राजकारणापेक्षा समाजकारण हा त्यांचा खरा पिंड होता. गेल्या काही वर्षांत राजकारणात जात धर्म यांना आलेले महत्त्व गिरीश बापटांना जराही शिवले नाही, याचे हे कारण. पक्ष म्हणून असलेली शिस्त पाळतानाही, आपल्या स्वभावाला मुरड किती आणि कशी घालायची, याबद्दलचे त्यांचे बरोबर आडाखे असत. ऐंशीच्या दशकात तारुण्यात बापटांनी राजकारणात प्रवेश केला. पक्षातल्या ज्येष्ठांबरोबरही त्यांची टवाळी करता येईल, इतकी जवळीक साधण्याची कला त्यांना अवगत होती. पक्षातल्या ज्येष्ठांचा मान राखतानाही, नव्याने अनेक युवकांना पक्षात येण्यास प्रवृत्त करण्यासाठी बापट सतत प्रयत्नशील असत. आपल्या सहकाऱ्यांना सगळ्या अडीअडचणीत मदत मागता येईल, असा विश्वास त्यांनी संपादन केला होता. सकाळपासून स्कूटरवर बसून शहरभर भ्रमंती करत समाजकारण करत जगमैत्री करण्याचा त्यांचा स्वभाव. त्यामुळे प्रत्येकाला ते आपले खरे मित्र आहेत, असे वाटे. ते बहुतेकवेळा खरेही असे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा