लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात संशोधक विद्यार्थ्यांवर इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत कमी निधी खर्च केला जातो. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना राज्य सरकारने अटी शिथिल करून सरसकट शिष्यवृत्ती देण्याची आवश्यकता आहे, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

eligible candidates in agricultural services exam finally get appointment letter
कृषी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना अखेर नियुक्ती पत्र मिळाले, विद्यार्थी म्हणाले धन्यवाद देवाभाऊ….
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Doctors MLA Chandrapur, Chandrapur,
चंद्रपूरमध्ये डॉक्टरांना आमदारकीचा वेध
amit kumar dalit student iit
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानं दलित विद्यार्थ्यासाठी ‘IIT’चे दार खुले; नेमकं प्रकरण काय? कोण आहे अतुल कुमार?
Rohit pawar on Tanaji Sawant
“मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकारची क्वालिटी का?” शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचं टीकास्र!
2019 scholarship scheme helps meritorious students from marginalized groups study abroad
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक घेताच ओबीसी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर
Sandip Ghosh
Sandip Ghosh R G Kar Hospital : “आरोप सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते”, संदीप घोष यांचा जामीन फेटाळताना न्यायालयाने नोंदवलं महत्वाचं निरीक्षण
Student Support Committee Pune  organization working for needy students
स्कॉलरशिप फेलोशिप: ‘विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे’; गरजू विद्यार्थ्यांचा पुण्यातला हक्काचा आधारवड

राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी येत्या १० जानेवारीला चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, परीक्षा न घेता सरसकट शिष्यवृत्ती देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात आहे. या मागणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडून गडकरी यांना निवेदन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी पाटील यांना पत्र दिले आहे.

आणखी वाचा-खरेदीच्या बहाण्याने दागिन्यांची चोरी; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

गडकरी यांच्या पत्रानुसार, पीएच.डी. करणाऱ्या प्रत्येक संशोधकाला समाजातील, देशातील प्रमुख अडचणी, दुखणी, कमतरता यावर शास्त्रशुध्द संशोधन, विदा संकलन करून संशोधनाची मांडणी करावी लागते. दोन शोधलेख, संधोधन लेखन यासाठी पीएच.डी. करणाऱ्यांना मेहनत घ्यावी लागते. मात्र, बार्टी, सारथी, महाज्योतीसारख्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. या विद्यार्थ्यांना राज्य सरकारद्वारे सरसकट शिष्यवृत्ती देणे गरजेचे आहे. मात्र पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.