पुण्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे (जीबीएस) रुग्ण आढळून आल्यानंतर पुण्यातील शुद्ध पाण्याचा प्रश्न चर्चेत आला आहे. पुणेकर मुबलक पाणी वापरतात, अशी ओरडही केली जाते. मात्र, ते शुद्ध असते, की अशुद्ध, यावर फारसे चर्वण होत नव्हते. ‘जीबीएस’नंतर हा विषय आता उघडपणे बोलला जाऊ लागला आहे. या पाणी चर्चेत पुण्याला धरणातून मिळणाऱ्या पाण्याबाबतचा विषय सध्या मागे पडला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या धरणांची पाणी साठवण क्षमता २९ दशलक्ष घन मीटर (टीएमसी) असून, पावसाळा संपल्यानंतर पाण्याचे वाटप करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली जाते; पण चार महिने होत आले, तरी ती झालेली नाही. या काळात १० टीएमसी पाणी ‘प्यायले गेले’ आहे किंवा ‘मुरले’ आहे. पाणीवाटपाचे नियोजन मग उर्वरित १९ टीएमसी पाणी संपल्यावर करणार का, असा सवाल पुणेकरांकडून विचारला जाऊ लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा