लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षार्थ्यांना समुपदेशकांकडून ताणतणाव व्यवस्थापनाबाबत मोफत मार्गदर्शन घेता येणार आहे.

CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
This years Maharashtra State Board exams include changes in grace marks awarding process
बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय…
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
MPSC , Pradeep Ambre , Amrita Shirke ,
‘एमपीएससी’ : प्रदीप आंबरे राज्यात पहिला तर अमृता शिरके दुसरी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षेची गुणवत्ता यादी…

राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आली आहे.

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ९०११३०२९९७, ९९६०६४४४११, ८२६३८७६८९६, ७२०८७७५११५, ८३२९२३००२२, ९५५२९८२११५, ९८३४०८४५९३ या क्रमांकावर परीक्षेपूर्वी, तसेच परीक्षेच्या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिकेसंबंधित समुपदेशकांना विचारणा करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader