पुणे : सिक्कीम ते मध्य महाष्ट्र या भागावर तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात गेल्या २४ तासांत बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारपर्यंत (२७ सप्टेंबर) संपूर्ण राज्याला पिवळा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, पावसाचा जोर विदर्भात जास्त राहणार असून उर्वरित राज्यात जोर कमी राहणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंगालच्या उपसागरात विविध ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. तसेच उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हिमालयाच्या पायथ्यापासून ते पंजाब, हरियाणा, दिल्लीपासून मध्यप्रदेशपर्यंत मोठा पाऊस झाला. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र असा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. या पट्टयाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे २७ सप्टेंबरपर्यंत फक्त विदर्भात जोर राहील, तर उर्वरित राज्यात पावसाचा कमी जोर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
weather department expressed possibility of increasing heat in Mumbai for next one or two days
मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
Temperature drop in Mumbai, Temperature ,
मुंबईच्या तापमानात घट

हेही वाचा : महिलेला धमकावून विनयभंग; माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा

दरम्यान, गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, कोल्हापूर, बीड, नंदूरबार, सातारा, जळगाव, धुळे, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, रायगड, नगर, नाशिक, सांगली, नांदेड, नागपूर असा सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्याचा पाऊस हा मोसमी पाऊसच असून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आहे. परतीचा पाऊस राजस्थानातून सोमवारपासून सुरु होत आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातून जाण्यास ५ ते १० ऑक्टोबरचा कालावधी उजाडणार आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.

हेही वाचा : पुणे : येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याकडून २६ लाखांचा अपहार

पिवळा इशारा २४ ते २७ सप्टेंबर

  • विदर्भ (यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला)
  • मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड)
  • मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा (२६), सोलापूर (२७),
  • उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव)
  • कोकण (रत्नागिरी, रायगड, ठाणे)

Story img Loader