पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे शनिवारी सकाळी किंचित पुढे सरकत बारामतीत पोहोचले असून, पुढील २४ तासांत पुण्यात, तर ४८ तासांत मुंबईत येण्याची शक्यता आहे. रविवारपासून (९ जून) मोसमी वारे राज्यात प्रचंड गती घेणार असून आगामी पाच दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधारांचा लाल इशारा देण्यात आला आहे.

मोसमी वाऱ्यांचे राज्यात ६ जून रोजी आगमन झाले. पण ते रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांत दाखल झाले. त्यामुळे पुढील २४ तासांत हे वारे पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र हवेचा दाब अनुकूल नसल्याने ते अडखळत पुढे जात आहे. त्यामुळे २४ तासांनी मोसमी वारे शनिवारी सकाळी किंचित पुढे सरकले आणि पुणे जिल्ह्यातील बारामतीत दाखल झाले. त्यामुळे त्या भागात पाऊस सुरू झाला आहे. आगामी २४ तासांत ते पुणे शहरात, तर पुढील ४८ तासांत मुंबईत दाखल होण्याचा अंदाज आहे.

Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Virgo Horoscope Today
Virgo Horoscope Today : मौनी अमावस्येचा दिवस कन्या राशीला देणार पैसा, प्रेम अन् सुखाचे क्षण; जाणून घ्या कन्या राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस
ISS Mahakumbh
Mahakumbh 2025 : लखलखता महाकुंभ! रात्रीच्या अंधारात उजाळून निघालीय गंगा नदी; अंतराळातून काढलेले फोटो तर पाहा!
February 2025 Grah Gochar
फेब्रुवारीमध्ये सुर्यासह ४ ग्रह करणार गोचर! ‘या’ ५ राशीच्या लोकांना मिळणार राजयोगासारखे सुख, चहुबाजुंनी मिळणार यश
makar Sankranti loksatta
काळाचे गणित : करी डळमळ भूमंडळ
Shukra Gochar 2025
शुक्र गोचरमुळे निर्माण होणार मालव्य योग, या पाच राशींना होणार प्रचंड धनलाभ; सुख संपत्तीने भरेल झोळी

हेही वाचा : ….तर मी वैयक्तिक स्वार्थासाठी अजित पवारांची साथ सोडेल – आमदार सुनील शेळके

दरम्यान, महाराष्ट्र ते अग्नेय अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील हवेचा दाब ९ जूनपासून अनुकूल होत आहे. या स्थितीमुळे आगामी २४ तासांत पुणे, तर पुढच्या ४८ तासांत ते मुंबईत येण्याची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू भागात अतिवृष्टी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम राज्यात दिसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ९ ते १३ जून दरम्यान मुसळधार ते अतिवृष्टी असा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ९ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये घाटमाथ्यावर ९ जूनपासून पाऊस वाढणार आहे.

हेही वाचा :पहिल्याच पावसात पुणे ‘पाण्यात’ : मुसळधार पावसामुळे पंधरा ठिकाणी झाडे कोसळली, वाहतुकीची कोंडी

राज्यातील इशारा

  • लाल इशारा – ९ जून – कोकण, मध्य महाराष्ट्र
  • नारंगी इशारा – १० आणि ११ जून – कोकण, मध्य महाराष्ट्र
  • पिवळा इशारा – ९ ते ११ जून – मराठवाडा, विदर्भ

Story img Loader