लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गेल्या २४ तासांपासून राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू झाला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात मध्यम पावसाची नोंद झाली. ३ जुलैपर्यंत या भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

India Beat South Africa by 7 Runs and Win T20 World Cup 2024 Trophy
T20 World Cup 2024: भारत ठरला विश्वविजेता, सूर्यकुमार यादवचा झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरला टर्निंग पॉईंट
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
intensity of rain will increase in next two days in state
Monsoon Update : राज्यात पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
maharashtra ministers in modi govt
मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?

दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून ते ३ जुलै या चार दिवसांत पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. मात्र, मराठवाड्यात मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती नसल्याने त्या भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी ९५ टक्के देश व्यापला असून हरियाणा, उत्तर प्रदेशचा काही भाग काबिज करण्याचे बाकी आहे. आगामी दोन दिवसांत मोसमी वारे संपूर्ण देश व्यापण्याचा अंदाज आहे. त्यानंतर काही दिवसांत हे वारे हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर ५ ते ६ जुलैपासून देशभरात पाऊस जोर धरेल, असा अंदाज हवामान विभागाने नोंदविला आहे.

आणखी वाचा-इंद्रायणी प्रदूषणमुक्त करणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

राज्यातील शनिवारचा पाऊस मिलिमीटरमध्ये

कोकण – रत्नागिरी १२०, हर्णे १००, लांजा ९८, पाली ९४, मंडणगड ८९, राजापूर ८०, माथेरान ७९, पनवेल ७७, माणगाव ७७, महाड ७७, पालघर ७६, चिपळूण ६७, म्हसळा ६६, रोहा आणि उल्हासनगर ६५, दापोली ६४, डहाणू ६३, जव्हार ६२, गुहागर ६१, विक्रमगड आणि श्रीवर्धन प्रत्येकी ६०, तलासरी ५६, पेण, उरण आणि वाकवली प्रत्येकी ५५, सावडे आणि कल्याण प्रत्येकी ५३, मुरबाड ५०, तळा ४५, दोडामार्ग ४५, अंबरनाथ ४४, पोलादपूर ४३, कर्जत ४२, कणकवली ४१, खालापूर आणि मुरुड ३९, यावल ८५, महाबळेश्वर ७९, बोदवड ७५, गगनबावडा ७२, शाहूवाडी ५९, अमळनेर ५४, वेल्हे ४९, लोणावळा ४४, राधानगरी ३७, हर्सुल २८, पालम २०, सोनपेठ १७, लोहा १४, धर्माबाद १२, हदगाव ११, धालेगाव, गंगाखेड आणि वसमत प्रत्येकी १०, गोंदिया ७५, तेल्हारा ४१, बुलडाणा ३९, शेगाव ३७, अकोट ३३, संग्रामपूर ३१, जळगाव आणि मलकापूर २८, कामठी २५, मोताळा २३, अंबोणे १४४, कोयना ९७, डुंगरवाडी ५३, नभरा ५०, शिरगाव ४५, दावडी ४४, ताम्हिणी ५८, लोणावळा ३७.