पुणे : यंदापासून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा लागू करण्यात आली. त्यात अनुत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये पुणे जिल्ह्यात शहरी भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली. त्यानुसार पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली आहे. तसेच पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याच वर्गात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>> भारतात दुचाकी एवढ्या महाग का? राजीव बजाज यांनी दिलं उत्तर…

Hanumankind music video woman maut ka kuan
Big Dawgs: ‘मौत का कुआं’मध्ये स्टंट करणारी कल्याणची कांचन आणि पती सुलतान शेखची प्रेम कहाणी, रॅपर साँगच्या माध्यमातून ठरली जगभरात चर्चेचा विषय
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
UP School
UP School : धक्कादायक! डब्यात नॉनव्हेज आणल्यामुळे विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकलं; नेमकी कुठे घडली घटना?
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
Reclaim the night womens in kolkat took out these night marches
स्री-‘वि’श्व: ‘रिक्लेम द नाइट’
The Medical Education Department has decided to take action against colleges that charge admission fees Mumbai news
प्रवेशाच्या वेळी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा
cet for admission to postgraduate engineering courses
पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी
An unknown person robbed a student in a college located in Thane
ठाणे: विद्यार्थ्यास कोयत्याचा धाक दाखवुन लुटले

या निर्णयाची अंमलबजावणी करून यंदापासून पाचवी, आठवी या वर्गांसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाची कार्यशाळा पुण्यात झाली. पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील मुख्याध्यापक या कार्यशाळेला उपस्थित होते. मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, की कार्यशाळेत सहभागी मुख्याध्यापकांकडून आलेल्या प्रतिसादानुसार शहरी भागातील पाचवी, आठवीच्या वर्गातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यात शहरी भागात पाच टक्के, तर ग्रामीण भागात तीन ते चार टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे निरीक्षण मुख्याध्यापकांनी नोंदवले. एखाद्या विषयात विद्यार्थ्याला कमी गुण असल्यास त्याला सवलतीचे गुण देण्याचा पर्याय असूनही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.