पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत अति मुसळधारेचा अंदाज आहे. किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असून, रत्नागिरी आणि साताऱ्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना लाल इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत पावसाचा विशेष जोर राहणार आहे. बहुतांश ठिकाणी अतिमुसळधारेची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, अमरावतीला नारंगी इशारा देण्यात आला असून, मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे.

weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
Bandra Worli sea bridge coastal raod will be inaugurated by CM Fadnavis on Republic Day
सागरी किनारा मार्ग पूर्णक्षमतेने सुरू होणार, सागरी किनारा आणि वरळी वांद्रे सागरी सेतू जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी लोकार्पण
Navi Mumbai Municipal Corporation has no choice but to devise new sources for water supply in next five years
वाढीव पाण्यासाठी प्रयत्नांची शर्थ; भीरा धरण, बारवीच्या पाण्यासाठी बैठकांचे सूतोवाच
Beach tourism, Sand mining, Vasai, tourism,
समुद्रकिनारा पर्यटन धोक्यात, वसईत वाळू उपसा सुरूच; प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
Regional Transport Department Officer Hemangini Patil claims about the reduction in accidents thane news
उपाययोजनांमुळे डिसेंबर महिन्यात अपघातामध्ये घट; प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी हेमांगिनी पाटील
Birds were counted at Tansa and Modaksagar Lakes by International Wetland and Forest Department
तानसा अभयारण्यात पक्षी गणना, ७५ पक्ष्यांची नोंद

हेही वाचा >>> डाळिंबावर तेल्या रोगाचे संकट; दुष्काळी पट्ट्यातील सततच्या पावसाचा परिणाम

पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला लाल इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत संततधारेची शक्यता आहे. किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्याला नारंगी इशारा देण्यात आला असून, मध्यम ते मुसळधारेची शक्यता आहे. पश्चिम घाटाच्या परिसरातही पावसाचा जोर कायम आहे.

हेही वाचा >>> मनोरमा खेडकर यांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी

शुक्रवारसाठी इशारे

लाल इशारा – रत्नागिरी, सातारा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया

नारंगी इशारा – सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर

पिवळा इशारा कोल्हापूर, नगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम राहील. राज्याच्या अन्य भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. – एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे

Story img Loader