पुणे : गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडे राहण्याचा आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीच्या नजीक वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून हवा दमट झाली आहे. त्यामुळे या परिसरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडे राहून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

party cruise in Vasai Sea, Vasai Sea, Vasai, relaxing party cruise,
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
According to the forecast of the Meteorological Department heavy rain fell on Monday
बदलापूर ते डोंबिवली परिसरात धो धो, मान्सूमोत्तर पावसाने अनेक भाग जलमय; नागरिकांची तारांबळ
tigers existence in sahyadri belt
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात आठ वाघांचे अस्तित्व
Leopard Nate area, Ratnagiri, Leopard, loksatta news,
रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश
High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
Loksatta lokjagar Gadchiroli War situation region Naxal affected areas Police Nilotpal
लोकजागर: गडचिरोलीचे यश!
cyclonic condition in Chhattisgarh will bring heavy rainfall to North Madhya Maharashtra for two days
राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस जाणून घ्या, परतीचा पाऊस कधी सुरू होतो

हेही वाचा >>> मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गहुंजे क्रिकेट मैदान परिसराला छावणीचे स्वरूप

किमान तापमानात वाढ मंगळवारी जळगावात ११.० अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक १६.७, महाबळेश्वर १६.५, सोलापूर १८.०, औरंगाबाद १४.० आणि नागपुरात १७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यभरात किमान तापमानात वाढीचा कल आहे.