पिंपरी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्तपदी डावलल्याने आळंदीकर ग्रामस्थांनी कार्तिकी यात्रेच्या पहिल्याच दिवशी निषेध मोर्चा काढला. मंदिरासमोर काही काळ ठिय्या मांडला. बंदलाही प्रतिसाद मिळत असून बंदमुळे वारकऱ्यांची गैरसोय होताना दिसत आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तपदी नुकतीच तीन विश्वस्तांची नेमणूक जिल्हा न्यायाधीशांनी जाहीर केली. तत्कालीन तीन विश्वस्तांच्या शिफारशीमुळे नवीन तीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिकांनी आज बंदचे आवाहन केले.

हेही वाचा : ‘मुळशी पॅटर्न’ चर्चेत! शेत जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशातून आणली चार पिस्तुले

area around Teen Hat Naka gripped by traffic jam due to illegal constructions and metro project works
ठाण्याचा तीन हात नाका टपऱ्यांनी कोंडला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
girish mahajan chhagan bhujbal l
छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? गिरीश महाजन म्हणाले…
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
pune municipal corporation winding road from siddhivinayak college to cummins college
कमिन्स महाविद्यालयाजवळील वाहतूक कोंडी सुटणार ? अडथळा ठरणारी भिंत तसेच दुकाने महापालिका प्रशासनाने काढली
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

चाकण चौक ते संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर मुख्य प्रवेशद्वारापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. टाळ वाजवत हा मोर्चा काढला. विश्वस्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी आळंदीत दाखल झाले आहे. सोहळ्याला कोणताही अडथळे निर्माण होणार नाही. त्याचबरोबर आमच्या मागण्या लोकशाही पद्धतीने मागणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Story img Loader