लोणावळा : काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे या भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला अखेर प्रणिती शिंदे यांनीच पूर्णविराम दिला आहे. माझी तत्व आणि विचार हे काँग्रेसचे आहेत. त्यामुळे मरेपर्यंत मी काँग्रेस सोडणार नाही. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. पक्षातून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना परत आणण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे. उलट आम्ही भाजपला संपवू असं म्हणत त्यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चेच खंडन करत टीका केली. प्रणिती शिंदे या लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. काँग्रेसच्या राष्ट्रीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे.

काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे म्हणाल्या, काँग्रेस जिथे जिथे लढेल तिथं आम्ही जिंकणार. भाजपच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. भाजप इतर नेत्यांवर दबाव टाकत आहे. या सर्व गोष्टींना नागरिक कंटाळले आहेत. त्यांना आता सक्षम पर्याय हवा आहे. त्या पुढे म्हणाल्या. भाजपच्या वाटेवर कोणीही नाही. जे गेले त्यांना काही पर्याय नव्हता. भाजप त्यांना मानसिकरित्या त्रास देत होते. नांदेडचे अनेक लोक आमच्यासोबत आहेत. तीच खरी काँग्रेस आहे.

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
Dharavi mosque illegal portion demolished
धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण
Nana Patole, Rahul Gandhi, Nana Patole on BJP,
राहुल गांधींना जीवे मारण्याचा भाजपाचा मानस – नाना पटोले
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू

हेही वाचा : वांद्रे आणि गेट वे जवळ स्फोट होणार; पुण्यातील नियंत्रण कक्षाला दूरध्वनी

पुढे त्या म्हणाल्या, किती आले- गेले तरीही काँग्रेस मजबूत आहे. या शिबिरात सर्व आमदार, काँग्रेस पदाधिकारी आले आहेत. कोणी कुठे जाणार नाही. कुणावर तेवढा ईडी चा दबाव नाही. सोलापूर लोकसभा लढवणार का? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्ष लोकसभेची तयारी करीत आहे. कोण कुठे लढणार हे अद्याप ठरलेलं नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. शंभर टक्के आमच्या रक्तात काँग्रेस आहे. जे पक्षातून गेले आहेत त्यांना परत आणण्याची आमच्यात क्षमता आहे. मरेपर्यंत मी काँग्रेसमध्ये असेल. माझे तत्व भाजप सोबत तडजोड करू शकत नाही. मी काँग्रेस सोबतच काम करणार तो विचार सगळीकडे पसरवणार आणि भाजपला आम्ही संपवू. असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.