पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत १ लाख ४७ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता शाळा प्रवेशासाठी सोडत काढावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

आरटीईअंतर्गत वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. त्यानुसार खासगी शाळांतील प्रवेशासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा राज्यभरातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ३१ मे ही अर्ज नोंदणीसाठीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे आतापर्यंत आलेल्या १ लाख ४७ हजार अर्जांमध्ये आणखी अर्जांची भर पडणार आहे. उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याच प्रवेशासाठी सोडत काढावी लागते. त्यामुळे उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज आले असल्याने आता प्रवेशासाठी सोडत काढावी लागणार आहे.

ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
The application deadline for 25 percent reserved seats in private schools under rte has been extended
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ, आतापर्यंत किती अर्ज दाखल?
teaching being hampered due to various committees are being formed
अबब, राज्यातील शाळांत १८ समित्या! शिक्षक मग शिकवितात केव्हा?
Unauthorized school, education officer,
अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास आता शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई
recruitment of professors loksatta
विश्लेषण : प्राध्यापक भरतीचे होणार काय?
What is the decision of the State Board of Secondary and Higher Secondary Education regarding the directors and supervisors of teachers during examinations Nagpur news
दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर नवीन वाद?….हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर…

हेही वाचा : पुणे: खिशावर येणार ताण… पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ किती?

शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या नियमात बदल केल्यानंतर खासगी शाळा, विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळल्या गेल्या होत्या. त्यामुळे शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी केलेल्या नोंदणीत जेमतेम ६८ हजार अर्ज दाखल झाले होते. मात्र न्यायालयाने या बदलाला स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागाला आरटीई प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे जुन्या पद्धतीने राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत खासगी, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचाही समावेश असल्याने पालकांकडून प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : पुणे : रिक्षाचालकाची पोलीस शिपायाला मारहाण; काय आहे प्रकरण?

दरम्यान, अर्ज नोंदणीसाठी दिलेल्या मुदतीत किती अर्ज येतात याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर अर्ज करायचे राहून गेले असल्यास त्यांना संधी मिळण्यासाठी नोंदणीसाठी मुदतवाढीचा विचार करण्यात येईल. त्यानंतर प्रवेशासाठीची सोडत काढण्याचे नियोजन केले जाईल, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

Story img Loader