पिंपरी- चिंचवड: महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी माझ्यासमोर उमेदवार कोण आहे हे मला माहीत नाही, असं विधान केलं होतं. याच विधानावरून आता महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी बारणे यांना खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बारणेंसाठी चार तास रोड-शो घ्यावा लागला. उपमुख्यमंत्री, पंतप्रधान यांना देखील यावं लागलं. यावरून बारणे यांना समोरील उमेदवार कोण आहे? नक्कीच कळलं असेल. आता त्यांना लक्षात आलं असेल, असा खोचक टोला संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांना पत्रकार परिषदेत लगावला आहे.

हेही वाचा : पाच पक्ष बदलणारे अमोल कोल्हे हे महागद्दार – शिवाजी आढळराव पाटील

chandrashekhar Bawankules warning to the rebels expulsion of the former MLA from the party
बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा, माजी आमदाराची पक्षातून हकालपट्टी
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Tushar Bharatiya criticize Ravi Rana, Tushar Bharatiya,
”तुम्‍ही आमदार नाही, सावकार निवडून दिला….”, रवी राणांवर तुषार भारतीय यांची टीका
sharad pawar s new strategy for Baramati
‘बारामती’साठी शरद पवारांची नवी खेळी? इच्छुकांच्या मुलाखतीसाठी युगेंद्र पवार आलेच नाहीत
There is a possibility of a split in the MIM party print politics
‘एमआयएम’ फुटीच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray appeal, Raj Thackeray,
जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आव्हान
Vijay wadettiwar
“निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच मविआची उमेदवारी”, विजय वडेट्टीवारांचे विधान
party corporator, Chandrakant Patil,
‘ते स्वतः येत नाहीत, दुसऱ्यालाही येऊ देत नाहीत,’ मंत्री चंद्रकांत पाटलांवर पक्षाच्या नगरसेवकाचे गंभीर आरोप!

वाघेरे म्हणाले, मुख्यमंत्री यांनी श्रीरंग बारणेंसाठी चार तास रोड- शो घेतला. आता तरी बारणे मला ओळखत असतील. मला ते ओळखत नव्हते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी सभा घेतल्या यावरून त्यांना कळलं असेल समोरील उमेदवार कोण आहे? पुढे ते म्हणाले, मावळ मतदारसंघात विकास झालेला नाही. विकासाच्या नावाखाली मतं घेतली. पक्ष सोडून गद्दारी केली. विकास शोधावा लागतोय. कामगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तसेच आहेत. पुढे ते म्हणाले, स्मार्ट सिटी आणि टीडीआर घोटाळा बद्दल ते आक्रमक होते, काहीतरी निघेल अस वाटलं. पण तो विषय आहे. तसाच राहिला आहे. पुढे ते म्हणाले, मी गद्दारी केली नाही. पक्ष फोडला नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारातून पक्ष सोडला आहे. ज्या पक्षाने दोन वेळेस खासदार केलं त्याला सोडून जाणं याला गद्दारी म्हणतात, असा टोला देखील संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांना लगावला आहे.