पुणे : पावसाळ्यातील हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे पावसाळा सुरू झाल्यापासून मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने सर्दी आणि तापाच्या तक्रारी अधिक दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

पावसाळ्यात मुलांना सर्दी, जुलाब आणि त्वचाविकारांचा सर्वाधिक त्रास होतो. याशिवाय मुलांमध्ये डोकेदुखी, ताप, बद्धकोष्ठता, भूक न लागणे अशी अनेक लक्षणे दिसतात. डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुनियाचे रुग्ण पावसाळ्यात जास्त नोंदवले जातात. ही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास पालकांनी दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पावसाळ्यात डास आणि माश्या वाढतात. माश्या अन्नावर बसतात तेव्हा अन्नातूनही अनेक रोग पसरतात. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे विषाणू आणि जिवाणूही वाढतात. त्यामुळे फ्लू, दमा, ॲलर्जी होण्याची शक्यता असते, असे आरोग्यतज्ज्ञ डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले.

loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Organ transplants, Sassoon Hospital, private hospitals,
अवयव प्रत्यारोपण आता अगदी कमी खर्चात! खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांना ससूनचा स्वस्त पर्याय
diabetics foot ulcers problem increasing in diabetic patients
डायबेटिक फूटमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना गमवावे लागतात प्राण!
Natural Ways To Dissolve Gall bladder Stones
पित्ताशयातील खडे शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिकरित्या काढता येतात का? वाचा डॉक्टरांचे मत
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
risk of heart disease is increasing at a young age
कमी वयातच हृदयविकाराचा वाढतोय धोका! तो कसा ओळखावा जाणून घ्या…
bmc commissioner bhushan gagrani praise sanitation workers
मुंबईकरांच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे प्रतिपादन

हेही वाचा : राज्यात ७८ तालुक्यांत अत्यल्प पाऊस, अवघ्या २४ टक्के क्षेत्रावर पेरणी

पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी अस्वच्छ पाणी साचते. अनेकदा मुले पावसाच्या पाण्यात खेळतात. लहान मुले कुठेही स्पर्श करतात आणि नंतर हाताची बोटे तोंडात घालतात. त्यामुळे ती आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. पालकांनी मुलांना अस्वच्छ पाण्यात खेळू देऊ नये. याचबरोबर घराभोवती पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ अभिमन्यू सेनगुप्ता यांनी दिला.

पावसाळ्यात कोणती काळजी घ्याल?

  • पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा.
  • उघड्यावरील आणि शिळ्या अन्नाचे सेवन टाळावे.
  • पिण्याचे पाणी उकळून घ्यावे.
  • थंडी, ताप, अतिसार झाल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
  • पाणी पाच दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवू नये.
  • घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा.

हेही वाचा : Porsche Car Accident : पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडीलांना जामीन मंजूर, पण तरीही कोठडीतच राहावं लागणार

पावसाळा सुरू झाल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून घ्यावे. याचबरोबर सर्दी, ताप, जुलाब यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात उपचार घ्यावेत.

डॉ. कल्पना बळीवंत, प्रभारी आरोग्य अधिकारी, महापालिका