पिंपरी- चिंचवड : शहरात आगीमध्ये होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे घडली आहे. ललित अर्जुन चौधरी (वय २१) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय २३) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. आधी लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली, मग त्याच्या झळा शेजारील विनायक अल्युमिनियम प्रोफाइल डोअर बसल्याने भीषण आग लागली. आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या दोघांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड : ‘जय सियाराम’चा नारा, मंगलमय वातावरण अन्‌ लाखो रामभक्तांची रथयात्रा!

Nashik leopard attack, Nashik, Child died leopard attack,
नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
dumper and car accident on solapur road
सोलापूर रस्त्यावर डंपरची मोटारीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
accident in Goregaon, two-wheeler accident Goregaon,
गोरेगावमध्ये दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू
Mumbai, boy died while playing,
मुंबई : शाळेत खेळताना आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
leopard attacks in shirur woman dies in leopard attacks in Jambut
शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी
Youth died, bike collision, Nagle,
वसई : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नागले येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक
Akola, Chardham Yatra, devotees, accident, uncontrolled tanker, Srikot, Garhwal, Srinagar, Uttarakhand, Badrinath, women devotees, treatment, Haridwar, Uttarakhand Police, mourning, Akola district
चारधाम यात्रेवर गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; अकोल्यातील दोन महिलांचा अपघातात मृत्यू

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री शहरातील वाल्हेकरवाडी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. याची छळ शेजारील दुकानांना बसल्याने त्याही दुकानांना भीषण आग लागली. शेजारील दुकानात दोन जण झोपले होते, त्यांचा झोपेतच बेशुद्ध होऊन होरपळून मृत्यू झाला आहे. या भीषण आगीत लाकडाची वखार जळून खाक झाली आहे. तसेच एक चारचाकी देखील जळाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची ५ वाहनं दाखल झाली होती. तर, अग्निशमन दलाच्या ४० जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.